शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

विधानसभेला मविआ एकसंघ राहायला हवी, जर नाही राहिली तर...; शरद पवारांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 2:32 PM

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठका सुरू झाल्यात. त्यात शरद पवारांनी हे भाष्य केले आहे. 

छत्रपती संभाजीनगर - लोकसभा निवडणुकीत राज्यात जसा निकाल लागला, त्यावरून विधानसभा निवडणुकीतही राज्यात लोकांना बदल हवाय. मविआ ज्यारितीने एकसंघ राहून लोकसभा लढली तशी विधानसभेला राहायला हवी, जर नाही राहिली तर आजच्या राज्यकर्त्यांना फटका बसेल पण लोकसभा इतका स्पष्ट निकाल लागला तर मला आनंद होईल असं सूचक विधान शरद पवारांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतही लोकांना बदल हवाय. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना लोकसभेला ज्यारितीने आम्ही एकसंघपणे लढलो तसं विधानसभेला ती एकसंघ येण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु त्याला मूर्त स्वरुप येणे गरजेचे आहे. हे आलं तर लोकसभेसारखी स्थिती दिसू शकेल. जर नाही आले तर आजच्या राज्यकर्त्यांना किंमत मोजावी लागेल पण लोकसभा इतका स्पष्ट निकाल लागला तर मला आनंद होईल. लोकसभा निवडणुकीला भाजपाच्या काही नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेत आम्हाला ४०० जागा हव्यात, संविधानात बदल करायची अशी जाहीर भूमिका मांडली. त्यामुळे लोकांच्यात अस्वस्थता होती. या देशात संविधानाने मुलभूत अधिकार दिला आहे. त्या अधिकारांवर गदा येण्याची भीती लोकांमध्ये होती. त्यामुळे या विरोधात मतदान करण्याचा निर्धार जनतेने केला. त्यातून ४०० वरून २७० वर जागा आल्यात असं त्यांनी सांगितले. 

तसेच मविआच्या बैठकांना सुरूवात झालीय, तिन्ही पक्षांनी ताळमेळ राहावा यासाठी काही नावं समोर आणलीत, संसदेच्या अधिवेशनानंतर पुढील बैठका होतील. काहीही झालं तरी जागांबाबत एकवाक्यता करावी, लोकांना चांगला पर्याय द्यावा यासाठी मविआत एकमत आहे. ३ पक्ष जसे महत्त्वाचे तसे डावे पक्ष ज्यांनी लोकसभेत एकही जागा न मागता राज्यात सहकार्य केले. त्यांना काही जागा सोडाव्यात अशी माझी सूचना आहे. जेव्हा चर्चेला सुरुवात होईल तेव्हा त्यातून मार्ग निघेल असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला.

..तोपर्यंत केंद्र सरकारला धोका नाही

चंद्राबाबू, नितीश कुमार यांच्या मदतीनं या सरकारची स्थिरता आहे. हे दोघेही पार्टनर जोपर्यंत मोदींसोबत आहेत तोपर्यंत केंद्र सरकारला धोका नाही. गेली १० वर्ष सर्व सत्ता मोदींच्या हाती होती आणि आता या सत्तेत वाटेकरी आलेत. त्यामुळे काही दिवसांत काय परिस्थिती असेल ते कळेल. एका मुठीत आता सरकार नाही असं शरद पवारांनी म्हटलं.

आमदारांच्या घरवापसीचा निर्णय पक्षात चर्चा करूनच होईल

काही लोकांनी पुन्हा पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे पण सरसकट सगळ्यांना घेण्याची मनस्थिती आमची नाही. जे लोक विचारांनी आमच्यासोबत होते, एकत्रित काम करण्याची मानसिकता त्यांची आहे. त्यांना फारसा कुणाचा विरोध असण्याची शक्यता नाही. मात्र काही जण असे आहेत ज्यांनी आमच्याविरोधात बरीच टोकाची भूमिका घेतली त्यांच्याबद्दल काय करावं, याची चर्चा आमच्या पक्षात होईल आणि त्यावर निर्णय होईल अशी माहिती शरद पवारांनी दिली. 

लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनेवरून टोला

निवडणुकीसाठी राज्य सरकारकडून अनेक घोषणा दिल्या गेल्यात, सरकारच्या तिजोरीत काय नाही मग देणार कुठून, निवडणुकीच्या आधी एखाद दुसरा हफ्ता देण्याचा प्रयत्न होईल. त्यातून जनमानस आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न दिसतोय. मात्र लोकांच्या मनात हीदेखील चर्चा आहे की इतके दिवस सत्तेत असताना असे निर्णय का घेतले नाही. हे निवडणुकीसाठी तात्पुरतं आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे त्याचा काही ना काही परिणाम होईल असं सांगत शरद पवारांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनेवर टोला लगावला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे