शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
2
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
5
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
6
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
7
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
8
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
9
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
10
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
11
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
12
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
13
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
14
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
15
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
16
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

नगरपालिका निवडणुका : सर्वोच्च न्यायालयाचे ऐकायचे की राज्य सरकारचे? निवडणूक आयोगासमोर पेच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 10:39 AM

निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित केली त्याच टप्प्यावरून पुढे सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला दिल्याने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला होता.

मुंबई : राज्यातील ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकारकडून राज्य निवडणूक आयोगाला केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले असताना आता राज्य सरकारचे ऐकायचे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायचे असा पेच आयोगासमोर असेल.

याआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात आयोगाने जिल्हा परिषद, नगर पंचायतींच्या निवडणुका घेतल्या होत्या. तत्कालीन सरकारने ओबीसी आरक्षण, कोरोना, आदी कारणे देऊन निवडणुका रोखण्याचा  प्रयत्न केला होता, पण त्यावेळी आयोगाने दाद दिली नाही आणि ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणुका घेतल्या होत्या. प्रभाग रचनेचे अधिकार स्वत:कडे घेत त्या आड निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केला, पण निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित केली त्याच टप्प्यावरून पुढे सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला दिल्याने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला होता.

ओबीसी आरक्षण आणि पाऊस ही दोन कारणे देऊन १८ ऑगस्ट रोजीच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राज्यात अतिवृष्टीची शक्यता नाही, अशा भागात निवडणुका घ्या आणि त्याचा पूर्ततता अहवाल सादर करा, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे.

राज्यातील नव्या सरकारला दोन  प्रमुख कारणांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूणच निवडणुका पुढे ढकलायच्या आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या तर नवीन सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाईल. ओबीसी आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकविता आले नाही अशी टीका करणाऱ्या भाजपवर त्यांचीच टीका उलटेल. त्यामुळे भाजपला आता निवडणूक नको आहे. याशिवाय महापालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदांच्या वॉर्ड/गणांची जी रचना महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आली ती भाजपसाठी सोईची नाही. त्यामुळे नवीन रचना करून त्या आधारे निवडणुका व्हाव्यात यावर नवीन सरकारचा भर असेल.

काँग्रेसचाही इशारानगर परिषदांच्या १८ ऑगस्टला होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी आता भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीनेही केली आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे व राष्ट्रवादीचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नये अशी मागणी केली. हीच मागणी करून काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, तरीही निवडणूक घेतली तर काँग्रेस पक्ष सरकारविरुद्ध आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्रSupreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदे