शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
2
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
3
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
4
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
5
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
6
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
7
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
8
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
9
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
10
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
11
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
12
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
13
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
14
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
15
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
16
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
17
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
18
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
19
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
20
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 

शेतक-यांना कजर्मुक्त करा - उध्दव ठाकरे

By admin | Published: May 04, 2016 12:44 PM

शासनाने शेतक-यांना कर्जावरील व्याजमाफी दिली ही चांगली बाब आह़े परंतु, यंदा पेरण्या झाल्या नाहीत़ त्यामुळे शेतकरी खचला आह़े.

ऑनलाइन लोकमत 

लातूर, दि. ४ -  शासनाने शेतक-यांना कर्जावरील व्याजमाफी दिली ही चांगली बाब आह़े परंतु, यंदा पेरण्या झाल्या नाहीत़ त्यामुळे शेतकरी खचला आह़े शिवाय, त्याच्यावर कर्जाचा डोंगरही आह़े केंद्र व राज्य शासनाने विचार विनिमय करुन शेतक-यांना एकदाचे कजर्मुक्त कराव़े, असे आवाहन  शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी दुपारी येथे कले. 
 
शिवसेनेच्या वतीने लातूर शहर व जिल्ह्यात ५० टँकरने मोफत पाणीपुरवठा तसेच तीन हजार पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण उध्दव यांच्या हस्ते बुधवारी लातुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे झाल़े याप्रसंगी ते बोलत होत़े दुष्काळ निवारणासाठी शासनाला सूचना करण्यास काही हरकत नाही़ परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसेल तर पावसाळी अधिवेशनात जाब विचारता येईल, असेही उध्दव म्हणाल़े.
 
मी भाषणासाठी आलेलो नाही, भाषणाने तहान भागत नाही़ मी दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या मराठवाडय़ातील जनतेला भेटायला आणि दिलासा द्यायला आलो आह़े भाषणो करणारे दुसरे आहेत़ आम्ही कोरडा दिलासा देत नाही अन दुष्काळावर राजकारणही करत नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.  राज्यातील ३३ कोटी जनता दुष्काळाच्या खाईत होरपळत आह़े त्यांना या दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न आहेत़ शेतक-यांच्या मुलींचे कन्यादान तसेच जलसंधारणाच्या कामाचा लोकवाटा शिवसेनेने भरलेला आह़े शिवसेना नुसतीच बडबड करीत नाही तर प्रत्यक्ष मदत करुन दुष्काळातून जनतेला सावरण्याचा प्रयत्न करीत आह़े सामाजिक बांधिलकीतून शिवसेनेचे काम सुरु आह़े असे काम कोणता राजकीय पक्ष दुष्काळात करीत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
 
सरकार कुठे कमी पडले त्यावर नंतर बोलू़
गेल्या १३७ वर्षात सर्वात उष्ण वर्ष यंदाचे आह़े. शिवाय, गेल्या सहा वर्षापासून पजर्न्यमान कमी झाल्याने मराठवाडाच काय, राज्यच दुष्काळात होरपळत आह़े  हा दुष्काळ निवारण करण्यास सरकार कुठे कमी पडले, यावर नंतर बोलू़ विरोधकांनाही पावसाळी अधिवेशनात बोलता येईल़ पण सध्या दुष्काळातून सावरण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले.
 
विदर्भाकडे महाराष्ट्राचे नेतृत्व
मराठवाडा संयुक्त महाराष्ट्राच्या विचारांचा आहे. त्यामुळे स्वतंत्र राज्याची मागणी मराठवाडा करुच शकत नाही़ विदर्भातील चार- दोन लोक वगळले तर संयुक्त महाराष्ट्रच त्यांनाही हवा आह़े सध्या तर विदर्भ महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आह़े मग वेगळे राज्य कशाला हवे, असा सवालही त्यांनी केला.