शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एक्स्प्रेसमधून ‘लोकल’ प्रवास बंद

By admin | Updated: June 27, 2016 05:39 IST

अपघात रोखण्यासाठी आणि गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेने तीन एक्स्प्रेसमधून लोकलच्या प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा तीन महिन्यांपूर्वी दिली होती

मुंबई : गर्दीच्या वेळेत लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी आणि गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेने तीन एक्स्प्रेसमधून लोकलच्या प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा तीन महिन्यांपूर्वी दिली होती. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली ही सेवा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहताच बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आणि ही सेवा अखेर बंद करण्यात आली. या सेवेमुळे मध्य रेल्वेला नुकसानीलाही सामोरे जावे लागले. २६ जानेवारी २0१६ पासून महालक्ष्मी एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस आणि लातूर एक्स्प्रेसमधून प्रवासाची मुभा देत, या सेवेला सुरुवात करण्यात आली. ठाणे आणि कल्याण स्थानकातून प्रवासाची मुभा देतानाच सेकंड क्लासच्या पासधारकांसाठी कल्याणमधून ३0 तर ठाण्यातून २0 रुपये आकारणी, तर फर्स्ट क्लास पासधारकांना कल्याणमधून २0 तर ठाण्यातून दहा रुपये मोजावे लागत होते. १0 आणि २५ च्या कुपन्सची पुस्तिका देताना प्रथम महिला प्रवाशांना प्राधान्य होते. महिलांकडून प्रतिसाद न मिळाल्यास, त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही, तर सर्व प्रवाशांसाठी ते कुपन उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही सेवा सुरू झाल्यानंतर त्याला अपेक्षेपेक्षा प्रतिसाद मिळाला नाही. फेब्रुवारी महिन्यापर्यंत तर एकूण ९00 पुस्तिकांपैकी अवघ्या आठ पुस्तिकांची विक्री झाली होती. मार्च आणि एप्रिल महिन्यातही तीच परिस्थिती होती. सुरुवातीच्या दोन महिन्यांत रेल्वेची फक्त १,६00 रुपये कमाई झाली. एकूणच होणारा खर्च आणि मिळत नसलेला प्रतिसाद पाहता, मध्य रेल्वेने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. ही सुविधा तीन महिन्यांसाठीच होती. प्रतिसादानंतर सुविधा सुरू ठेवायची की नाही, याचा निर्णय घेण्यात येणार होता. (प्रतिनिधी)>सेवा बंद होण्याची कारणेएखादी जलद लोकल जरी उशिरा धावत असली, तर धिम्या लोकलचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध आहे. एक्स्प्रेसच्या बाबतीत तसे नाही.एक्स्प्रेसचे दरवाजे हे लोकलच्या दरवाजांच्या तुलनेत फारच अरुंद असतात. त्यामुळे चढताना आणि उतरताना प्रवाशांना त्रास होण्याची भीती होती, तसेच एक्स्प्रेसचे प्रवासीही सकाळी स्थानकांवर उतरण्याच्या तयारीत असल्याने लोकल प्रवाशांची अडचणच होत होती.