शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
3
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
4
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
5
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
6
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
7
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
8
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
9
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
10
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
11
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
12
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
13
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
14
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
15
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
16
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
17
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
18
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
19
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
20
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले

आता मोदींच्या निशाण्यावर शरद पवारांचा कौटुंबिक कलह!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 3:43 PM

नरेंद्र मोदी या सभेत त्यांच्या नेहमीच्या शैलीत काँग्रेस पक्ष, राहुल गांधी यांच्यावर आक्रमण करीत पुलवामा, बालाकोट आणि 'मिशन शक्ती' याचे भांडवल करतील, असे अपेक्षित होते.

विश्लेषण :राजा माने

वर्ध्यातील दुपारी बाराचे ४१चा पारा गाठायला आसुसलेले ऊन! आशा रणरणत्या उन्हात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी मैदानावर चौफेर तोफा डागल्या. पण मुख्य टारगेट ठरले शरद पवार!आक्रमक बाणा आणि महाराष्ट्राच्याही राजकारणात सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इरादा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्ध्यातील शुभारंभाच्या सभेत स्पष्ट झाला. २०१४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रचाराचा शुभारंभ मोदी यांनी याच भूमीत केला होता. सेवग्राम आणि महात्मा गांधी-विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुणित झालेल्या वर्ध्याच्या भूमितूनच त्यांनी त्यावेळी आपल्या पंतप्रधान पदाची दावेदारी त्या सभेत स्पष्ट केली होती. २०१९ च्या आपल्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ करताना त्यांनी थेट शरद पवार परिवारावरच सर्जिकल स्ट्राईक केला. मोदी या सभेत त्यांच्या नेहमीच्या शैलीत काँग्रेस पक्ष, राहुल गांधी यांच्यावर आक्रमण करीत पुलवामा, बालाकोट आणि 'मिशन शक्ती' याचे भांडवल करतील, असे अपेक्षित होते. त्यांनी ते तर केलेच शिवाय देशाला अंतराळ क्षेत्रात अभिमान वाटावा अशा कामगिरीबद्दल वैज्ञानिकांचे अभिनंदन करून या पुढच्या चाचण्या जनतेला पाहण्यासाठी खुल्या करण्यात आल्याची घोषणाही केली.

महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण आणि देशाच्या राजकारणात शरद पवारांचा असलेला बोलबाला लक्षात घेऊन त्यांनी पवार परिवारावरच हल्ला चढविला. माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची केलेली घोषणा आणि नंतर घेतलेली माघार या मागच्या पवार कुटुंबातील कथाकथित संघर्षाची झालेली जोरदार चर्चा याचा नेमका उपयोग मोदींनी पवारांवर निशाना साधताना आज केला. त्यांच आक्रमण महाराष्ट्रातील काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी आणि शरद पवार कुटुंबावरच बेतलेले दिसते. राष्ट्रवादीची पक्ष संघटना आणि कौटुंबिक ऐक्यावर शरद पवारांचा प्रभाव उरला नसल्याचा संदेश देत होते. तो देताना पवारांचे वजन पूर्वीसारखे राहिले नसल्याचे सांगताना त्यांच्यावर पुतण्यानेच मात केल्याचा धागा त्यांनी पकडला. पवारांची माढ्यातली उमेदवारी आणि त्यांचे नातू पार्थ पवार यांची मावळ उमेदवारी यावरून झालेल्या राजकाराणाचा उल्लेख करून मोदी थांबले नाहीत. अजित पवारांचे शेतीच्या पाणीवरून गाजलेले वादग्रस्त विधान आणि मावळमध्ये शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार याचीही आठवण त्यांनी करून दिली. कौटुंबिक पातळीवर पोहचून एखाद्या राज्यातील नेत्यावर असा हल्ला मोदींनी कदाचित पहिल्यांदाच केला असेल. वर्ध्यातील त्यांच्या भाषणातील प्रत्येक मुद्दांना आक्रमकतेची झालर होतीच. परंतु, त्याला राज्यातील पवारांसारख्या प्रमुख नेत्यांनाच टार्गेट करण्याची नवीन स्ट्रॅटर्जी मोदी आणि भारतीय जनता पक्षाने आखल्याचे दिसते.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख असलेले शरद पवार सध्या काँग्रेसच्या समन्वयाकाची भूमिका साकारत असल्याचे वृत्त नेहमीच येते. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला लक्ष्य करण्यापेक्षा शरद पवारांना लक्ष्य केल्यास आपला हेतू साध्य होऊ शकतो, हे मोदींनी हेरल्याचे दिसते. त्यातच पवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून घेतलेली माघार भाजपच्या भितीपोटीच असल्याचे भासविण्यात, मोदींनी यश आले. तसेच २०१४ च्या निवडणुकीतही अजित पवार यांचे धरणाच्या पाण्यावरील वादग्रस्त वक्तव्य चांगलेच गाजले होते. त्यावेळी देखील भाजपकडून त्या वक्तव्याचा शस्त्राप्रमाणे वापर करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा मोदींनी अजित पवारांच्या त्या वक्तव्याला जोडून शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराचा मुद्दा समोर केला आहे. या मुद्दावर राज्यातील भाजप पुन्हा एकदा पवारांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाSharad Pawarशरद पवार