शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

भाजपवाले राज ठाकरेंमुळे कसे झाले बेजार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 11:10 IST

मी २०१४ मध्ये मोदींना पाठिंबा देणारा पहिला नेता होतो. मात्र पंतप्रधान झाल्यावर हा माणूस एवढा बदलला की, मला माझी भूमिका बदलावी लागल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांचे महाराष्ट्र दौरे सुरू झाले असून अनेक ठिकाणी सभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा देखील महाराष्ट्र दौरा झाला आहे. यापुढेही महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या सभा होणार आहेत. परंतु, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यामुळे भाजपवाले चांगलेच बेजार झाले आहे. २०१४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे भाजपला फायदाच झाला होता. परंतु, यावेळी राज ठाकरे यांनी मोदीविरुद्ध भूमिका घेत शनिवारी घेतलेल्या मेळाव्यात मोदींचा खोटेपणा पुराव्यानिशी माध्यमांसमोर मांडला. त्यामुळे मोदींची प्रतिमा आणखी खराब होण्याच्या मार्गावर असून यामुळे भाजपवाले बेजार होणार, असं चित्र आहे.

राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात मोदींवर कडाडून टीका केली. तसेच राहुल गांधी यांना एकदा संधी देऊन पाहण्याचे आवाहन केले. काँग्रेस विरोधात असल्यावर त्याचे महत्त्व कळते, असंही राज यांनी सांगितले. तसेच मी २०१४ मध्ये मोदींना पाठिंबा देणारा पहिला नेता होतो. मात्र पंतप्रधान झाल्यावर हा माणूस एवढा बदलला की, मला माझी भूमिका बदलावी लागल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदी प्रत्येक प्रचार सभेत सैन्याचा पराक्रम आणि आम्ही सैन्याला दिलेले अधिकार याविषयी सांगत असतात. राज ठाकरे यांनी हाच धागा पकडून काश्मीरमध्ये मोदींनी दिलेल्या भाषणांची क्लिप सर्वांना ऐकवली. त्यात, आपणच सैनिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे मोदी काश्मीरमधील सभेत सांगताना दिसत होते. त्यामुळे मोदी खोट बोलत असल्याचे स्पष्ट झाले. दुसरी बाब म्हणजे, मोदींच्या बीफ निर्यातीसंदर्भातील भूमिकेसंदर्भातील क्लिप राज यांनी सर्वांना ऐकवली. त्यामुळे मोदींचा दुटप्पीपणा समोर आल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी दिलेल्या पुराव्यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. २०१४ मध्ये मोदींच्या समर्थनात जशी चर्चा होती, तशी चर्चा आता मोदींच्या जुन्या क्लिपची आहे. यामुळे मोदींवर नेटकरी टीका करत आहेत. भाजपमध्ये मोदी स्टार प्रचारक आहेत. मात्र सोशल मीडियावर मोदींना होत असलेला विरोध पाहता भाजप नेत्यांच्या चितेंत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMNSमनसेNarendra Modiनरेंद्र मोदी