शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

...जेव्हा ड्रायव्हरला मतदानापासून रोखणारा उमेदवार एका मताने पडतो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 6:00 PM

माझ्या एका मताने काय होणार, अशी अनेकांची भावना असते. मात्र भारताच्या इतिहासात अनेकांना एका मतामुळे पराभव पत्करावा लागला आहे. या एका मताची किंमत या उमेदवारांना नक्कीच कळली असेल.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत प्रत्येकांन मतदान करावे यासाठी विविध माध्यमांतून आवाहन करण्यात येत आहे. आजही अनेक जण मतदानाच्या दिवशी मिळालेली सुट्टी मतदान न करता बाहेरगावी घालवतात. माझ्या एका मताने काय होणार, अशी अनेकांची भावना असते. मात्र भारताच्या इतिहासात अनेकांना एका मतामुळे पराभव पत्करावा लागला आहे. या एका मताची किंमत या उमेदवारांना नक्कीच कळली असेल.

कर्नाटकमध्ये २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता दल धर्मनिरपेक्षचे उमेदवार ए.आर. कृष्णमूर्ती यांचा काँग्रेसच्या आर. ध्रुवनारायण यांच्याविरुद्ध संथेमाराहल्ली दक्षिण मतदार संघातून एका मताने पराभव झाला होता. कृष्णामूर्ती यांना ४०७५१ मते मिळाली होती. तर ध्रुवनारायण यांना ४०७५२ मते पडली होती. धक्कादायक बाब म्हणजे, कृष्णमूर्ती यांनी आपल्या ड्रायव्हरलाच मतदान करण्यापासून रोखले होते.

राजस्थानमध्ये २००८ विधानसभा निवडणुकीत देखील अशी घटना घडली होती. राजस्थान काँग्रेसचे प्रमुख सी.पी. जोशी यांचा भाजपच्या कल्याणसिंह चौहान यांच्याविरुद्ध एका मताने पराभव झाला होता. जोशी यांना ६२२१५ तर चौहान यांना ६२२१६ मते मिळाली होती. जोशी यांची आई, बायको आणि ड्रायव्हर यांनी मतदान केले नव्हते. त्यामुळे मतदान करण्याचे महत्त्व जोशी यांना खऱ्या अर्थाने कळले यात शंका नाही.

मुंबई महानगर पालिकेत २०१७ मध्ये अशीच घटना घडली होती. महापालिकेतील २२० वार्डमधील उमेदवारांना एका मताचे महत्त्व नक्कीच कळले असेल. या निवडणुकीत सुरुवातीला शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर यांचा विजय झाला होता. परंतु, भाजप उमेदवार अतुल शाह यांनी नव्याने मतमोजणी घेण्याची मागणी केली. त्यात दोघांना प्रत्येक ५९४६ मते मिळाली होती. त्यानंतर लॉटरी काढण्यात आली. यामध्ये नगरसेवक पदाची माळ शाह यांच्या गळ्यात पडली होती. परंतु या ठिकाणी दोघांपैकी एकाला एक मत मिळाले असते, तरी निकाल वेगळाच राहिला असता. या घटनांवरून एक मत किती महत्त्वाचे हे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या महत्त्वपूर्ण मताचे दान करायलाच हवे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान