शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

औरंगाबादेत 'ट्रॅक्टरच फॅक्टर'; इम्तियाज जलील आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 12:46 IST

अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे खैरेंची मते मोठ्या प्रमाणात विभागली गेली आहे. त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांना होत असल्याचे दिसत असले तर हर्षवर्धन देखील आगेकूच करत आहे.

मुंबई - देशभरातील लोकसभा निवडणूक भाजप प्रणीत एनडीए सरकार जोरदार कामगिरी करत आहेत. तोच कित्ता एनडीए महाराष्ट्रात देखील गिरवत आहे. गेल्या वेळपेक्षा यावेळी एनडीएची कामगिरी सरस होत आहे. मात्र शिवसेना गड मानला जाणाऱ्या औरंगाबादेत मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचे ट्रॅक्टरच फॅक्टर ठरताना दिसत आहे. तर इम्तियाज जलील आघाडीवर आले आहे. त्यामुळे शिवसेनेचा गड धोक्यात असल्याचे चित्र आहे.

अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे खैरेंची मते मोठ्या प्रमाणात विभागली गेली आहे. त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांना होत असल्याचे दिसत आहे. तर हर्षवर्धन देखील आगेकूच करत आहे. त्यामुळे लढत हर्षवर्धन, खैरे आणि जलील यांच्यात असली तरी खैरे दोघांपेक्षा मागे दिसत आहेत.

दरम्यान मराठा मोर्चाच्या वेळी मराठा समाजाला दिलेला पाठिंबा हर्षवर्धन यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहे. मराठा समाज त्यांच्यामागे खंबीरपणे उभा असल्याचे समजते. दुसरीकडे खैरे यांना यावेळी बंडखोरीचे ग्रहन लागल्याचे चित्र आहे. तर जलील यांना मुस्लीम आणि दलितांची एकगठ्ठा मते मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. यात काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. एकूण या चुरशीच्या स्थितीमुळे औरंगाबादेत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AurangabadऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv SenaशिवसेनाImtiaz Jalilइम्तियाज जलील