शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

'यामुळे' पवारांना वाटते गडकरी, राजनाथ सिंह यांच्या भवितव्याची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 14:25 IST

अनेक सर्व्हेमधून देशात त्रिशंकू निकाल लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत एनडीएला गडकरी एकसंध ठेवू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालनंतर देशात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास पंतप्रधान पदासाठी भाजप नेते नितीन गडकरी यांचे नाव समोर येते. त्याचवेळी पंतप्रधानपदासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नावाची देखील अधुनमधून चर्चा रंगत असते. मात्र या दोघांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आल्यापासून आपल्याला त्यांच्या भवितव्याची चिंता वाटते, असं राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले. एक मुलाखतीत शरद पवार बोलत होते.

अनेक सर्व्हेमधून देशात त्रिशंकू निकाल लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत एनडीएला गडकरी एकसंध ठेवू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच गडकरी संघाच्या जवळचे असून ही त्यांच्यासाठी जमेची बाब ठरेल अस मत अनेकांचे आहे. त्यामुळे गडकरी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी समोर येत असते. मागील काही दिवसांत गडकरी देखील सरकारला घरचा आहेर देताना दिसले आहेत. दुसरीकडे राजनाथ सिंह भाजपचे ज्येष्ठ नेते असून पंतप्रधान म्हणून मोदी नसले तर राजनाथ असंही अनेकांना वाटते. यावर पवारांनी आपले मत स्पष्ट केले.

गडकरी आणि राजनाथ यांचे नाव समोर आल्यास त्यांची काळजी वाटते. गडकरी माझे चांगले मित्र आहे. राजनाथ सिंह देखील भला माणूस आहे. मात्र त्यांचे नाव आल्यास त्यांच्या भवितव्याबाबत चिंता वाटते. सध्या मोदी आणि अमित शाह यांच्याकडे भाजपची सुत्रे आहेत. ज्यावेळी गडकरी, राजनाथ यांचे नाव पंतप्रधानपदासाठी समोर येईल, त्यावेळी भाजपचे सुत्रधार या दोघांसोबत काय करतील, हे आपण सांगू शकत नाही, अशी भितीही पवार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNitin Gadkariनितीन गडकरीRajnath Singhराजनाथ सिंह