शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

गावातील पाणी टंचाईमुळे महिलांनी शिवसेना आमदारच भाषण थांबवल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 15:43 IST

शिवसेना आमदार संदीपान भुमरे, भाजप जिल्हाउपाध्यक्ष सुनील शिंदे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्यासाठी गेले होते. यावेळी आमदार यांचे भाषण सुरू असतानाच गावातील महिलांनी हातात हंडे घेत बैठकीत दाखल झाल्या. आमच्या गावात पाणी टंचाई आहे,जनावरांना चार नाही. आधी आमच्या समस्या सोडवा नंतर तुमचे भाषण ठोका अशा प्रकारे पवित्रा घेत भाषण बंद पाडले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आलेल्या शिवसेना आमदाराला महिलांनी घेराव घालत गावातील पाणी टंचाई बद्दल जाब विचारला. गावात पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, त्यावर आधी बोला असे म्हणत महिलांनी आमदारच भाषण बंद पाडले. महिलांची आक्रमकता पाहून आमदार आणि प्रचाराला गेलेल्या कार्यकर्त्यांनी आपले भाषण आवरते घेऊन काढतापाय घेतला.जालना लोकसभा मतदारसंघात पैठण तालुक्यातील अनके गावात सोमवारी भाजपचे उमदेवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ गाव भेटी घेऊन बैठक घेण्यात आल्या. लिंबेगाव येथे शिवसेना आमदार संदीपान भुमरे, भाजप जिल्हाउपाध्यक्ष सुनील शिंदे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्यासाठी गेले होते. यावेळी आमदार यांचे भाषण सुरू असतानाच गावातील महिलांनी हातात हंडे घेत बैठकीत दाखल झाल्या. आमच्या गावात पाणी टंचाई आहे,जनावरांना चार नाही. आधी आमच्या समस्या सोडवा नंतर तुमचे भाषण ठोका अशा प्रकारे पवित्रा घेत भाषण बंद पाडले.

महिलांनी घेतलेल्या भुमिकेमुळे आमदार भुमरे आणि शिवसेना-भाजप नेते यांनी महिलांना बैठक झाल्यावर आपण चर्चा करू असे आवाहन केले. मात्र गावकरी महिला यांचा रोष वाढत असल्याचे लक्षात घेत आमदार भुमरे यांनी आपले भाषण आवरते घेत, गावात अजून एक टॅंकरची व्यवस्था करतो असे सांगत गावातून काढतापाय घेतला.

जालना लोकसभा मतदारसंघातील अनेक भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे याच मतदारसंघातील ११ गावांनी मतदानावर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सरकार बद्दल प्रचंड रोष पाहायला मिळत असून हा रोष मतपेटीत पाहायला मिळाला तर भाजपचे रावसाहेब दानवे यांच्या अडचणी वाढू शकतात.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdroughtदुष्काळWaterपाणीFarmerशेतकरीShiv Senaशिवसेना