शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

अपेक्षित मतविभाजन नाही, कापूस, सोयाबीनवरून नाराजी; विदर्भात भाजपची चिंता वाढली

By यदू जोशी | Updated: April 21, 2024 07:07 IST

दुसऱ्या टप्प्यातही आव्हान, कार्यकर्ते गावोगावी फिरत असताना त्यांना शेतकऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. त्याबाबतची माहिती त्यांनी पक्षनेतृत्वाला दिली आहे. 

मुंबई : विरोधी मतांचे अपेक्षित मतविभाजन होताना दिसत नाही आणि त्याचवेळी कापूस आणि सोयाबीनचे भाव पडल्यावरून शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी, या मुद्द्यांमुळे पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपची चिंता वाढली आहे. शुक्रवारच्या मतदानाची टक्केवारी, कोणत्या भागात किती मतदान झाले याचा आढावा घेण्याचे काम पक्षाकडून सुरू झाले असून, प्राथमिक माहिती फारशी अनुकूल नसल्याचे समजते. 

पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात पक्षासाठी जे चिंतेचे मुद्दे समोर आले त्यांची झळ दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील अन्य पाच मतदारसंघांमध्ये बसू नये यासाठीचे ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे, असे भाजपच्या पक्षसंघटनेत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. शेतमालाच्या दरासंदर्भात शेतकरी नाराज असल्याचा फीडबॅक पक्षाकडे आला आहे. कार्यकर्ते गावोगावी फिरत असताना त्यांना शेतकऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. त्याबाबतची माहिती त्यांनी पक्षनेतृत्वाला दिली आहे. 

कॉंग्रेसमधील अंतर्गत संघर्षाचा फायदा नाहीभाजपला दरवेळी आपल्या विरोधातील मतांच्या विभाजनाचा फायदा होतो. पहिल्या टप्प्यात फार मोठ्या प्रमाणात असे विभाजन होताना दिसत नाही. फक्त भंडारा-गोंदिया (अपक्ष सेवक वाघाये) आणि रामटेक (वंचित समर्थित किशोर गजभिये) यांना मिळालेली मते ही आमच्या पथ्यावर पडतील, असा तर्क या दोन मतदारसंघांतील भाजपचे काही नेते देत आहेत. नागपूरसह सर्वत्र काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकी दिसली. काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षाचा फायदा घेण्यात भाजपला फारसे यश आलेच नाही, असेही बोलले जात आहे.

दुसऱ्या टप्प्यात उणीव भरून काढण्याची तयारीशेतमालाच्या पडलेल्या दराचा मुद्दा काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचारात उचलला. अशावेळी केंद्र व राज्य सरकारने शेतकरी हिताचे जे निर्णय घेतले ते प्रभावीपणे मतदारांसमोर मांडले गेले नाहीत, ही बाबही प्रकर्षाने समोर आली आहे. ही उणीव दुसऱ्या टप्प्यात भरून काढण्याची कसरत सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मदतीचे आश्वासन देण्याची तयारीकापूस, सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांना पडेल भावात करावी लागली. आता त्यांना क्विंटलमागे मदत करण्यात अडचणी आहेत, तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर लगेच एकरी मदत देण्यासंदर्भातील आश्वासन दुसऱ्या टप्प्यात महायुतीच्या नेत्यांकडून दिले जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसंबंधीचे मुद्दे अधिक प्रभावीपणे प्रचारात समोर आल्याने मोदीकेंद्रित प्रचार अपेक्षित परिणाम साधू शकला नाही, असे काहींचे निरीक्षण आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४nagpur-pcनागपूरramtek-pcरामटेक