शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
3
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
4
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
5
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
6
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
7
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
8
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
9
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
11
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
12
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
13
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
14
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
15
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
16
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
17
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
18
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
19
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
20
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात

एकमेकांची उणीदुणी काढू नका, विधानसभेच्या तयारीला लागा, फडणवीसांनी कान टोचले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 8:11 AM

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: निवडणुकीत जय-पराजय होतच असतात, पण पराभवानंतर त्याचे खापर एकमेकांवर फोडायचे नसते. सगळ्यांनी जबाबदारीने आणि एकमेकांच्या सुरात बोलले पाहिजे, ही वेळ आता एकमेकांची उणीदुणी काढण्याची नाही. एकमेकांना सोबत घेऊन  पुढे जाणे महत्त्वाचे आहे

 मुंबई - निवडणुकीत जय-पराजय होतच असतात, पण पराभवानंतर त्याचे खापर एकमेकांवर फोडायचे नसते. सगळ्यांनी जबाबदारीने आणि एकमेकांच्या सुरात बोलले पाहिजे, ही वेळ आता एकमेकांची उणीदुणी काढण्याची नाही. एकमेकांना सोबत घेऊन  पुढे जाणे महत्त्वाचे आहे. यासंदर्भात आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही बोलणे झाले आहे, अशा शब्दांत आमदार व पदाधिकाऱ्यांचे कान टोचतानाच महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचा झेंडा फडकत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आणि तुम्हीही थांबू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी शनिवारी दादर येथे भाजप विधिमंडळ गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपाचे मंत्री, नेते, आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. 

पंतप्रधान मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याप्रमाणेच तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होत आहेत.- याबाबत भाजप विधिमंडळ गटाकडून नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला.

चार पक्षांशी लढलोयंदाच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही तीन पक्षांशी नव्हे तर चार पक्षांशी लढत होतो. तो चौथा पक्ष म्हणजे अपप्रचार होता. हा खोटा प्रचार आपल्या लक्षात आला नाही. त्यामुळे आपण त्याला रोखू शकलो नाही. भाजप संविधान बदलणार, महाराष्ट्रातले उद्योगधंदे इतर राज्यात पळवले गेले, भाजप मराठा आरक्षणाविरोधी आहे, असा खोटा प्रचार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.दोन वेळा आपण मराठ्यांना आरक्षण दिले, मात्र ज्यांनी १९८० पासून मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्याकडे मराठा समाजाची मते गेली. आपण मराठा विरोधी आहोत, असा खोटा प्रचार करण्यात विरोधक यशस्वी झाले.उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र गुंतवणुकीत खाली होता. यावर्षी अशी परिस्थिती अशी आहे की, गुजरात, कर्नाटक दिल्ली यांची एकत्रित बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे, असाही खुलासा त्यांनी केला. 

योग्य वेळी योग्य गोष्टी करूनिवडणुकीचा निकाल लागताच मी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलोय. एक मिनिटही मी शांत बसणार नाही. आता मी काम करत आहे. करणार आहे, असं सांगतानाच 'योग्य वेळी योग्य गोष्टी करू', असे सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केले.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस