शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"सफाई कामगाराचा ड्रेस घालून आमदार बंगल्यावर आले अन् मी अ‍ॅम्ब्युलन्समधून गेलो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 11:59 IST

संजय राऊतांसमोरून गुलाबराव पाटील गेला. जे आमदार गेलेत त्यांना परत बोलवा असं मी सांगितले. पण त्यावेळी या लोकांनी आम्हाला हिणवलं गेले असं गुलाबराव पाटील यांनी मेळाव्यात म्हटलं.

जळगाव - अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. उद्धव ठाकरेंसोबतचे ४० आमदार रातोरात बाजूला झाले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात या आमदारांनी ठाकरेंविरोधातच बंड केले. त्यातून सूरत, गुवाहाटी, गोवा प्रवास करून ते महाराष्ट्रात परतले. राजकारणातील या घडामोडींबाबत अनेक किस्से सांगितले जातात. त्यातच शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी मी अ‍ॅम्ब्युलन्सनं गेलो होते असा आणखी एक किस्सा सांगितला.  

जळगावच्या कार्यकर्ता मेळाव्यात गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेना-भाजपा निवडणूक जिंकली, त्यानंतर कुणी सत्ता बदलायला लावली हे सांगायला मी उभा नाही. पक्षाचा नेता आदेश देतो, त्याप्रमाणे आमदारांनी काम करायचे असते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, मला कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. पण जेव्हा आमच्या लक्षात आलं, आपण आपल्या विचारांपासून लांब जातोय तेव्हा आम्ही उद्धव ठाकरेंना थांबवण्याचा प्रयत्न केला. लोक म्हणतात, हे फुटले, फुटले नाही तर यांच्यासमोर गेलो. संजय राऊतांसमोरून गुलाबराव पाटील गेला. जे आमदार गेलेत त्यांना परत बोलवा असं मी सांगितले. पण त्यावेळी या लोकांनी आम्हाला हिणवलं त्यामुळे आम्ही २० आमदार गायब झालो असं त्यांनी म्हटलं. 

तसेच मला घ्यायला गिरीश महाजन आले, मंगेश चव्हाण सफाई कामगाराचा ड्रेस घालून आले. माझ्या बंगल्यावर कोण आलंय पाहिले, मी कशाने गेलो तर अ‍ॅम्ब्युलन्सनं गेलो. ३३ नंबरवर मी गेलो. जे मला गद्दार म्हणतायेत, तेव्हा आम्ही वेट अँन्ड वॉच केले. झालेली चूक दुरुस्ती करू शकतो, आपण पुन्हा आपल्या वळणावर येऊ शकतो. म्हणून मी पहिल्या लाईनमध्ये गेलो नाही. ३३ नंबरवर मी गेलो असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, आपलं सरकार आलं, या अडीच वर्षात सरकारी गती आणि प्रगती आपण पाहतोय. ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिले जाते. इथे जातपात बघितली जात नाही. निवडणूक आल्यावर मुस्लीम धोक्यात आहे असं काँग्रेसवाले सांगतात. आपण जी कामे केलीत ती लोकांपर्यंत सांगा. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-मनसे-आरपीआय एकजुटीनं प्रचार करायचा आहे. आपली ताकद दाखवून द्यायची आहे असं आवाहन गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांना केले. 

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे