शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
3
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
4
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
5
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
6
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
7
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
8
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
9
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
10
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
11
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
12
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
13
अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात, संतापून म्हणाले, 'काहीही फो़डू शकतो...'; अंकिताची दाखवली 'ही' चूक
14
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
15
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
16
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
17
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
18
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
19
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
20
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर

विरोधकांच्या 'या' ४ नॅरेटिव्हमुळं महायुतीला बसला फटका; देवेंद्र फडणवीसांचं विश्लेषण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 4:06 PM

loksabha Election Result - राज्यातील निकालात महायुतीला बसलेला फटका आणि त्याचं चिंतन करण्यासाठी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालात राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. राज्यातील ४८ जागांपैकी ३१ जागांवर महाविकास आघाडी विजयी झाली तर महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावं लागलं. या पराभवानंतर भाजपानं आज पदाधिकारी, आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी पराभवाचं विश्लेषण करत विरोधकांनी जे नॅरेटिव्ह तयार केलं त्यात ते यशस्वी झाले असं सांगत आगामी काळात ताकदीने जिंकू असं म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशात ज्याप्रकारे नरेंद्र मोदींना जनतेनं समर्थन दिले, तिसऱ्यांदा सरकार आलं. ओडिशा, आंध्र प्रदेश याठिकाणी आपलं सरकार आलं. मागील ३ निवडणुका मिळून जेवढ्या जागा काँग्रेसला मिळाल्या नाहीत तेवढ्या जागा या एका निवडणुकीत मिळाल्यात. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेली मते ४३.०९ टक्के तर महायुतीला मिळालेली मते ४३.०६ टक्के आहेत. मतांमध्ये जास्त फरक नाही. पण त्यांना ३१ आणि आपल्याला १७, केवळ २ लाख मते महाविकास आघाडीला मिळालीत. मुंबईचा विचार केला तर महाविकास आघाडीला २४ लाख आणि महायुतीला २६ लाख मते आहेत. याचं विश्लेषण केले तर आपण केवळ ३ पक्षांशी लढत नव्हतो तर एका खोट्या नकारात्मक नॅरेटिव्हला आपण रोखू शकलो नाही असं त्यांनी सांगितले. 

कोणते ४ नॅरेटिव्ह? 

१) संविधान बदलणार 

भाजपा सत्तेत आल्यास संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला त्याचा निकालावर परिणाम झाला. पहिल्या ३ टप्प्यापर्यंत आपण गाफील राहिलो. त्यामुळे या टप्प्यातील २४ जागांमध्ये केवळ ४ जागा आपल्याला आहेत. दलित, आदिवासी समाजात दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात झाला. जेव्हा जेव्हा मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी नेता निवडीपूर्वी संविधानाच्या पाया पडले. संविधानाला ७५ वर्ष पूर्ण होतायेत. त्यामुळे पुढील १ वर्ष भारताच्या संविधानाचा महोत्सव देशात साजरा केला जाणार आहे असं मोदींनी सांगितले. त्यामुळे आता हा नॅरेटिव्ह जास्त काळ चालणार नाही. 

२) पक्ष फोडाफोडी

जर त्यांच्या यशाचं विश्लेषण केले तर त्यांना कुठे मते मिळाली आणि कुठे नाही यातून हा नॅरेटिव्ह किती खोटा आहे लक्षात येईल. विशेषत: मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा नॅरेटिव्ह तयार केला. पण आश्चर्य वाटतं मराठा समाजाला दोन्ही वेळेला आपण आरक्षण दिले, महामंडळे, अनेक योजना या आपल्या काळातच झाल्या. मराठा समाजाचा फटका बसला पण ज्यांनी १९८० पासून मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्याकडे मते गेली. याचा अर्थ नॅरेटिव्ह तयार करण्यात विरोधक यशस्वी झाले. पण आपला मतदार सगळा गेला असता तर ४३ टक्के मते मिळाली नसती. 

३) महाराष्ट्रातले उद्योग पळवले 

महाराष्ट्रातले उद्योग पळवले हा तिसरा नॅरेटिव्ह तयार केला. प्रत्यक्ष आकडेवारी पाहिली तर २०२२-२३, २३-२४ या दोन्ही वर्षात महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात गुजरात, कर्नाटक पुढे होते. परंतु आपल्या काळात गुजरात-कर्नाटक यांचं मिळूनही जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आली. मात्र रोज खोटे बोलायचे, उद्योग पळवले बोलायचे जर उद्योग पळाले असतील तर गुजरातच्या दुप्पट आणि गुजरात-कर्नाटकपेक्षा जास्त गुंतवणूक आपल्याकडे कशी आली असती?

४) उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती 

उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती असती तर मुंबई, कोकणात दिसायला हवी होती. ठाण्यापासून कोकणापर्यंत उबाठाला एकही जागा मिळाली नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर यात एकही जागा मिळाली नाही. मुंबईतल्या जागा कुणाच्या भरवशावर मिळाल्या हे आपल्याला माहिती आहे. मराठी माणसांच्या मतांवर निवडून आले नाहीत. मराठी माणसांनी मत दिलं असते तर दक्षिण मुंबईत वरळीत जिथं आदित्य ठाकरे आमदार आहेत केवळ ६ हजार मते अधिक मिळाली. शिवडीत ३०-४० हजार मताधिक्य घेऊ शकले नाहीत. मराठी माणसाने मतदान केले असते तर मराठी बहुल भागात उद्धव ठाकरेंना फार मोठे मताधिक्य मिळाले नाही. परंतु विशिष्ट समाजाच्या मतांवर एखाद्या विधानसभेत प्रचंड मताधिक्य मिळाल्याने त्यांच्या जागा आल्या. कोकणात उद्धव ठाकरेंना लोकांनी हद्दपार केले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल