शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

...तर भाजपने नथुराम गोडसेला ही तिकीट दिले असतं : काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 15:16 IST

भाजप बेशरमपणे अशा व्यक्तीचे समर्थन करत आहे, जी व्यक्ती दहशतवाद आणि राष्ट्रविरोधी कारवायात सामील आहे. जवानांच्या बलिदानावर मतदान मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रज्ञा सिंहच्या वक्तव्यावर, जनतेची माफी मागावी वाटली नाही, अस सावंत यांनी नमूद केले.

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली. त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात संतापाची लाट आली होती. आता काँग्रेसने देखील भाजपवर प्रज्ञा सिंह यांना दिलेल्या उमेदवारीवरून कडाडून टीका केली आहे. महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे जिवंत असते, तर त्यांना देखील भाजपने तिकीट दिले असते, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

जामिनावर सुटलेल्या प्रज्ञा सिंह यांनी २६/११ हल्ल्यात शहिद झालेल्या हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. मी दिलेल्या श्रापामुळेच त्यांचा सर्वनाश झाल्याचा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला होता. आपल्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार केल्यामुळेच आपण करकरेंना श्राप दिला होता, असंही त्यांनी म्हटले होते. विषेश म्हणजे, भाजपकडून तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. त्यानंतर भाजपकडून प्रज्ञा सिंह यांचे समर्थन देखील करण्यात आले. यामुळे प्रज्ञा सिंह यांचे वक्तव्य भाजपच्या हिंदू कार्ड चालवण्यामागची योजना तर नव्हती ना, अशी शंकाही उपस्थित होत आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले की, भाजप बेशरमपणे अशा व्यक्तीचे समर्थन करत आहे, जी व्यक्ती दहशतवाद आणि राष्ट्रविरोधी कारवायात सामील आहे. जवानांच्या बलिदानावर मतदान मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रज्ञा सिंहच्या वक्तव्यावर, जनतेची माफी मागावी वाटली नाही, असंही सावंत यांनी नमूद केले. तसेच एवढा विरोध झाल्यानंतरही प्रज्ञा सिंह यांची उमेदवारी कायम राखल्यामुळे भाजपकडून दहशतवादाचे समर्थन करण्यात येत असल्याचे स्पष्ट होते, असा टोलाही सावंत यांनी लागवला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस