शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 10:16 IST

Loksabha Election - उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवर टीका करत भाजपाला पराभवाची भीती आहे, त्यामुळे पंतप्रधानांना रस्त्यावर फिरण्याची वेळ आलीय असा आरोप केला.

मुंबई - Sanjay Raut on BJP ( Marathi News ) भाजपा निवडणूक माफिया आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकणं हे त्यांना महत्त्वाचे आहे. पंतप्रधानपदाची जबाबदारी कधी सांभाळणार, रोड शो करणं त्यांचे काम नाही. पराभवाची भीती असल्याने हे सुरू आहे. जिथे जिथे मोदी जातील तिथे शिवसेना महाविकास आघाडी जिंकणार आहे. १ नव्हे ४ रोड शो करा, जिथे मोदी जातील तिथे आम्ही जिंकू हे सूत्र आहे असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला. 

संजय राऊत म्हणाले की, तुमच्यावर दारोदार भटकण्याची आणि रस्त्यावर फिरण्याची वेळ का आली हे लोकांना कळू द्या. पंतप्रधान देशभरात रोड शो करतात, त्यांना दुसरं काम नाही का? घाटकोपरला १८ मृत्यू झाले तिथे जाऊन अश्रू ढाळण्याचं नाटक ते करतील. महाराष्ट्रातील जनतेनं मोदी गो बॅक अशी घोषणा दिली आहे. मोदी नको अशी भावना जनतेत आहे. जिथे मतदान झालंय तिथल्या ९० टक्के जागा मविआ जिंकतेय. उर्वरित जागा महाविकास आघाडी जिंकतेय. मोदी ब्रँड संपलाय, ४ जूननंतर झुला घेऊन मोदींना हिमालयात जायचंय असंही त्यांनी सांगितले. 

तसेच प्रफुल पटेल यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता. त्याच मिरचीवाल्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप डोक्यावर घालून घेतला. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. मोदी महाराष्ट्र तोडण्याचं स्वप्न पाहतंय. ज्याच्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप आहे त्यांच्याकडून अशाप्रकारे जिरेटोप घालून छत्रपतींचा अवमान केला जातोय या घटनेकडे महाराष्ट्रातील जनता गांभीर्याने पाहतेय असंही संजय राऊत यांनी म्हटलं. 

दरम्यान, महाविकास आघाडीनं देशाच्या पंतप्रधानांना रस्त्यावर आणलं आहे. गल्लीगल्लीत, रस्त्यावर पंतप्रधानांना भाजपावाले पराभवाच्या भीतीनं फिरवत आहेत. मुंबईतल्या ६ जागांवर आम्ही लढतोय. त्यातल्या ६ पैकी ६ जागा जिंकण्याचा आमचा इरादा आहे. मोदींना मुंबईत ठाण मांडून बसावं लागतंय. नाशिक, कल्याण आणि घाटकोपर इथं येणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात धारावी पॅटर्न राबवला गेला. त्यांच्या नेतृत्वात धारावीतून कोरोना हद्दपार झाला. त्याचे श्रेय जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. त्यावर दुसऱ्याने बोलण्याची गरज नाही असं संजय राऊतांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४mumbai-north-east-pcमुंबई उत्तर पूर्व