शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

उद्धव ठाकरे अडचणीत, 'त्या' दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेची चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 1:41 PM

loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील मतदानादिवशीच उद्धव ठाकरेंनी भाजपासह निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर भाजपानं याबाबत आयोगाकडे तक्रार केली होती.  

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबई, ठाण्यासह इतर भागात मतदान पार पडलं. यावेळी मुंबईतल्या मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं चित्र होतं. मतदानासाठी होत असलेली दिरंगाई आणि मतदारांना मिळणाऱ्या असुविधा यामुळे उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या दिवशीच पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगासह भाजपावर निशाणा साधला होता. या पत्रकार परिषदेबद्दल भाजपानं निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली होती. 

आता निवडणूक आयोगनं या तक्रारीची दखल घेतली आहे. मुंबईतल्या निवडणुकीदिवशी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती. ही पत्रकार परिषद चौकशीच्या फेऱ्यात आली असून त्यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत येऊ शकतात. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. 

काय होता आशिष शेलार यांचा आरोप?

निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला टार्गेट केले होते. मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे कशी काय पत्रकार परिषद घेऊ शकतात असा सवाल करत आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. उद्धव ठाकरेंनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत ठाकरेंची पत्रकार परिषद खोटी आणि दिशाभूल करणारी असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शेलारांनी केली होती. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

निवडणूक आयोगा हा भाजपाचा घरगडी असून त्यांच्याकडून पक्षपातीपणा करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर जाणुनबुजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जातोय. मतदारांनी मतदानाला उतरू नये. बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावं यासाठी हा सरकारचा डाव आहे. ठाकरे गटाला भरघोस प्रतिसाद मिळत असलेल्या वसाहतींमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून दिरंगाई करण्यात आली. तसेच वेगवेगळे पुरावे मागून मतदारांचा छळ केला गेला. पराभवाच्या भीतीने पछाडलेल्या भाजपने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विरोधकांच्या मतपेटी क्षेत्रात कमी मतदानाचा खेळ खेळला असा आरोप उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि भाजपावर केला होता. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAshish Shelarआशीष शेलारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४