शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 16:02 IST

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा बाकी असून आता ४ जून रोजी लागणाऱ्या निकालाची सर्वांना उत्सुकता आहे. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा १ जूनला पार पडणार आहे. महाराष्ट्रातील सर्व टप्प्यातील मतदान संपले असून आता ४ जूनच्या निकालाची सर्व प्रतिक्षा करत आहेत. राज्यात ४८ जागांसाठी मतदान पार पडलं. याठिकाणी महायुतीविरुद्धमहाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळाली. मात्र राज्यात निकालाआधीच अनेक उमेदवारांनी जिंकण्याचे दावे केले आहेत. काही उमेदवारांच्या विजयाचे पोस्टर्सही झळकल्याचं समोर आलं आहे.

त्यातच लोकनीती-सीएसडीएसचे प्रोफेसर आणि राजकीय विश्लेषक संजय कुमार यांनी जी भविष्यवाणी केली आहे. त्याने अनेकांची झोप उडाली आहे. न्यूज तकशी बोलताना प्रोफेसर संजय कुमार यांनी महाराष्ट्राच्या लोकसभा निकालांची भविष्यवाणी केली आहे. हा निकाल हैराण करणारा आहे. संजय कुमार यांच्या भविष्यवाणीनुसार राज्यातील भाजपाला मोठा धक्का बसत आहे. कारण याठिकाणी भाजपाचं मिशन ४५ अपयशी ठरणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

काय आहे भविष्यवाणी?

महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी चांगली कामगिरी करताना दिसत आहे. २०१९ च्या तुलनेत काँग्रेसला जास्त यश मिळेल. तर जागांच्या बाबतीत भाजपाची कामगिरी निराशाजनक असेल. काँग्रेसला यंदा प्रादेशिक पक्षांचे समर्थन अधिक मिळालं. महाविकास आघाडी राज्यात २५-२६ जागा जिंकण्याची शक्यता आहे तर महायुतीला एकूण २१ ते २२ जागा मिळू शकतात. मागील लोकसभा निवडणुकीत NDA नं महाराष्ट्रात ४८ जागांपैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे याठिकाणी एनडीएला फटका बसताना दिसत आहे. 

कुणी किती जागा लढल्या?

महायुतीचं बोलायचं झालं तर भाजपानं २८ जागांवर निवडणूक लढली. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने १५ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं ४ जागांवर उमेदवार उभे केले होते. महायुतीनं राष्ट्रीय समाज पक्षाला १ जागा दिली होती. तर महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वाधिक २१ जागा लढवल्या. त्यानंतर काँग्रेसनं १७ जागांवर निवडणूक लढवली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागांवर निवडणूक लढवली आहे.  

पक्षफोडीमुळे भाजपाला नुकसान?

२०१९ ला राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली. मुख्यमंत्रि‍पदावरून शिवसेना-भाजपाचं बिनसल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत राज्यात सत्ता काबीज केली. त्यानंतर अडीच वर्षांनी शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात फूट पडली. शिंदेसोबत पक्षातील ४० आमदार, १२ खासदार बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरही दावा सांगितला. निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारे एकनाथ शिंदेंकडे शिवसेना सोपवली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे या निवडणुकीत मशाल चिन्ह घेऊन मैदानात उतरले. तर २०२२ मध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत फूट पडली. तिथेही घड्याळ चिन्ह आणि पक्षाचं नाव अजित पवारांना मिळालं. त्यामुळे राज्यातील २ मोठ्या प्रादेशिक पक्षात फूट पडल्यानं स्थानिक जनतेमध्ये रोष असल्याचं दिसून आलं होते. त्यामुळे या पक्षफोडीमुळे भाजपाचं नुकसान होणार असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी