शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

जायकवाडीतून पाणी सोडणे लांबणीवर

By admin | Published: September 01, 2016 7:26 PM

जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यातून खरीप पिकांसाठी उद्या शुक्रवारी पाणी सोडण्याची तयारी जलसंपदा खात्याने केली

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 1 - जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यातून खरीप पिकांसाठी उद्या शुक्रवारी पाणी सोडण्याची तयारी जलसंपदा खात्याने केली होती. मात्र गेल्या दोन दिवसात लाभक्षेत्रातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. म्हणून जायकवाडीतून पाणी सोडणे लांबणीवर टाकण्यात आले आहे. आता पावसाची ओढ पडल्यावरच धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

जायकवाडी धरणाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक मंगळवारी मुंबईत पार पडली. त्यात लाभक्षेत्रातील पिके वाचविण्यासाठी जायकवाडी धरणातून तातडीने खरीपाचे आवर्तन देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय माजलगाव धरणात साडेचार टीएमसी आणि परळी येथील औष्णिक विद्यूत केंद्रासाठीही ५ दलघमी पाणी सोडण्याचे निश्चित झाले. त्यानुसार औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण(कडा) कार्यालयाने जायकवाडीतून पाणी सोडण्याची तयारी केली होती. त्यानुसार २ सप्टेबर रोजी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार होते.

मात्र लाभक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड जिल्ह्यांमधील बहुतेक ठिकाणी मंगळवारी आणि बुधवारी रात्री समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे धोक्यात आलेल्या खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाले. या पार्श्वभूमिवर आता कडा कार्यालयाने जायकवाडीतून खरीपासाठी शुक्रवारी पाणी सोडण्याचे नियोजन पुढे ढकलले आहे. खरीपासाठी पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतलेले आहे. त्यानुसार लाभक्षेत्रातील खरीप पिकांना जायकवाडीतून पाणी मिळणार आहे. परंतु ते आत्ताच देण्याऐवजी आणखी काही दिवसांनी सोडले जाणार आहे.जायकवाडीतून माजलगाव धरणातही साडेचार टीएमसी आणि परळी येथील औष्णिक विद्यूत केंद्राला ५ दलघमी पाणी दिले जाणार आहे. माजलगावसाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून तर परळीसाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडावे लागते. खरीपासाठी दोन्ही कालवे सुरु करण्यात येणार असल्यामुळे माजलगाव आणि परळीसाठीही शुक्रवारपासूनच पाणी सोडण्याचे नियोजन होते. मात्र आता खरीपाची पाणी पाळी लांबल्यामुळे माजलगाव आणि परळीला नंतरच पाणी सोडण्यात येणार आहे. खरीपासाठी पाणी सोडण्याची तयारी पूर्ण झाली होती. परंतु आता काही भागात पाऊस झाला आहे. सध्या पिकांसाठी पाण्याची तेवढी गरज राहिलेली नाही. म्हणून पाणी सोडणे पुढे ढकलले आहे. आणखी काही दिवसानंतर किंवा पावसाची ओढ पडल्यावर लगेचच जायकवाडीतून पाणी सोडले जाईल.- संजय भर्गोदेव, प्रभारी अधीक्षक अभियंता, कडा