शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

जालना रोडवर पावणेबारा लाखांची लूट

By admin | Published: March 14, 2016 11:51 PM

शहराच्या सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवर सोमवारी सायंकाळी एका कापूस व्यापाºयाचे मोटारसायकस्वार तिघांनी तब्बल पावणेबारा लाख रुपये लुटून नेले. खंडपीठाच्या सिग्नलवर ही घटना घडली.

 - कापूस व्यापा-याची बॅग पळविली

औरंगाबाद : शहराच्या सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवर सोमवारी सायंकाळी एका कापूस व्यापाºयाचे मोटारसायकस्वार तिघांनी तब्बल पावणेबारा लाख रुपये लुटून नेले. खंडपीठाच्या सिग्नलवर ही घटना घडली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली.

घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शेख रियाज शेख वजीर (४०, रा. कौडगाव, औरंगाबाद) हे कापूस खरेदी-विक्रीचा व्यापार करतात. गावातून खरेदी केलेला दोन ट्रक कापूस नुकताच त्यांनी औरंगाबादेतून परराज्यात पाठविला होता. पाठविलेल्या कापसाचे पेमेंट घेण्यासाठी ते सोमवारी गावातील देवराव भावराव पुंड (५५) यांच्यासोबत मोटारसायकलवर बसून औरंगाबादेत आले. सायंकाळी रियाज यांनी औरंगपुºयातील एका ठिकाणाहून विकलेल्या कापसाचे ११ लाख ७२ हजार रुपये पेमेंट घेतले. ही रक्कम एका बॅगमध्ये ठेवली. ती बॅग देवरावच्या हातात दिली. बॅग घेऊन हे दोघे मोटारसायकलवर पुन्हा गावाकडे जाण्यासाठी निघाले. 
जालना रोडने ते गावाकडे परतत होते. औरंगाबाद खंडपीठासमोर सिग्नल लागल्याने रियाज यांनी दुचाकी थांबविली. त्याचवेळी अचानक एक मोटारसायकल त्यांच्या बाजूला येऊन थांबली. त्या दुचाकीवर तिघे बसलेले होते. काही समजण्याच्या आत बाजूच्या मोटारसायकलवरील तिघांपैकी एकाने हिसका मारून देवरावच्या हातात असलेली पावणेबारा लाख रुपयांनी भरलेली बॅग ओढून घेतली. बॅग हाती येताच तिघे सिग्नल तोडून सुसाट वेगाने सिडको बसस्थानकाच्या दिशेने निघून गेले. 
या प्रकाराने रियाज व देवराव यांनी आरडाओरड सुरू केली. मात्र, काही हालचाल करण्याच्या आत लुटारूंची दुचाकी गायब झाली होती. हा प्रकार जवळच उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसाच्या लक्षात आला. तातडीने या पोलिसाने नियंत्रण कक्षात माहिती कळविली. माहिती मिळताच मोठा फौजफाटा घटनास्थळी आला. नंतर पोलिसांनी नाकाबंदी करून लुटारूंचा शोध सुरू केला. मात्र, आरोपी हाती लागले नाहीत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.