शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

कोरोनाच्या नावाखाली लुटालूट; किराणा मालासह अन्य वस्तू चढ्या भावाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 06:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाउनच्या काळात वेगवेगळी कारणे पुढे करत अत्यावश्यक वस्तू आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाउनच्या काळात वेगवेगळी कारणे पुढे करत अत्यावश्यक वस्तू आणि किराणा चढ्या भावाने विकला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. एमआरपीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागल्याचा आक्षेप ७१ टक्के ग्राहकांनी नोंदवला आहे.

मूळ उत्पादकांनी वस्तूंच्या किंमतींमध्ये वाढ केलेली नाही. कमिशनही घटवलेले नाही, तरीही किरकोळ व्यापाऱ्यांनी सवलती रद्द करून जास्त दराने विक्री केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अवघ्या २५ टक्के ग्राहकांनी मूळ किंमतीत वस्तू मिळाल्याचे म्हटले आहे. वस्तू घरपोच देणे, मजुरांची टंचाई, हमाली, वाहतुकीचा वाढलेला खर्च अशी कारण देत चढा भाव लावल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

लोकल सर्कल या संस्थेने देशाच्या २१० जिल्ह्यांतील विविध उत्पन्न गटातील सुमारे १६ हजार ५०० ग्राहकांशी चर्चा करून तयार केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. त्यात ४६ टक्के महिला आणि ५४ टक्के पुरूषांचा समावेश होता. महानगरांमधील ३२ टक्के लोकांचे अभिप्राय यात आहेत. लॉकडाउनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर ५३ टक्के ग्राहक जवळच्या किराणा दुकानातूनच साहित्याची खरेदी करतील, असा या पाहणीचा निष्कर्ष आहे. आॅनलाइन (१७ टक्के) आणि रिटेल स्टोअरमधून आॅनलाइन खरेदी (८ टक्के) असे खरेदीचे प्रमाण असेल, असे या सर्वेक्षणात दिसून आले.

ई कॉमर्स कंपन्यांचा मुकाबला करण्यासाठी किरकोळ दुकानदारही पूर्वी काही सवलती देत होते. मात्र, ई कॉमर्सला लॉकडाउनचा तडाखा बसताच किरकोळ व्यापाऱ्यांनीही सवलती रद्द केल्या. आता ई कॉमर्सच्या सवलती सुरू होत असल्याने किरकोळ व्यापाºयांकडील सवलती पुन्हा मिळतील, अशी आशा ग्राहकांनी व्यक्त केली आहे.

आपली सोसायटीच बरी!लॉकडाउनच्या काळात अनेक सोसायट्यांनी त्यांच्या आवारात किराणा माल मागवला. त्याच पद्धतीने पुढील काळातही खरेदी करण्याचा मानस १८ टक्के ग्राहकांनी व्यक्त केला. अन्य ग्राहकांतील २८ टक्के ग्राहकांना कोरोनाच्या दहशतीमुळे पुढील काळातही दुकानांमध्ये जाण्याची भीती वाट असून त्यांनीही घरपोच साहित्य मागवण्याकडेच कल असेल, असे मत नोंदवल्याचे हा अहवाल सांगतो.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस