शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

महिलांच्या विकासाला घातला खो

By admin | Published: March 07, 2016 1:11 AM

राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या महिला व बाल विकास विभागानेच या न्यायदानाच्या कामापासून फारकत घेतली आहे.

हिनाकौसर खान-पिंजार,  पुणेराज्यातील पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या महिला व बाल विकास विभागानेच या न्यायदानाच्या कामापासून फारकत घेतली आहे. महिलांच्या तक्रारी नि:पक्षपाती सोडविण्यासाठी राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाची राज्यातील व्याप्ती वाढावी म्हणून प्रस्तावित करण्यात आलेल्या सहा विभागीय कार्यालयांना पाठिंबा देण्याऐवजी विभागाने तो फेटाळला आहे. त्यामुळे मुंबईपासून दूर असलेल्या ग्रामीण भागातील पीडित महिलांना आजही हे आयोग एक स्वप्नच राहिले आहे.समाजात वावरत असताना स्त्रीला कुठेना कुठे अन्यायाला सामोरे जावेच लागते. तेव्हा अशा अन्यायग्रस्त पीडित महिलांच्या तक्रारीवर लवकरात लवकर सुनावणी होऊन त्यांना न्याय मिळावा. राज्य महिला आयोगाची स्थापना झाली. मात्र सद्य:स्थितीत महिला आयोगाचे केवळ मुंबई येथेच कार्यालय आहे. त्यामुळे पीडीत महिलेला आपली तक्रार नोंदवण्याकरिता मुंबईत जावे लागते. अनेक महिलेला येणे-जाणे परवडणारे नाही. त्यामुळे त्या आयोगाकडे दादच मागत नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्य महिला आयोगाने २०१० मध्येच महिला व बाल विकास विभागाकडे विभागीय पातळीवर कार्यालये सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. आयोगाचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण राज्य आहे. मुंबई वगळता अन्य ठिकाणी त्याचे कोणतेही कार्यालय नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये फक्त मुख्यालयातून नियंत्रण ठेवणे प्रशासकीयदृष्ट्या शक्य होत नाही तसेच खेडोपाडीच्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत तात्काळ कार्यवाही ही शक्य होत नसल्याने विभागीय कार्यालये सुरू होणे आवश्यक असल्याचे आयोगाच्या प्रस्तावात स्पष्ट केले आहे. सद्य:स्थितीत महिलांच्या अन्याय, अत्याचार व संरक्षणाच्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून २९५ समुपदेशन मदत केंद्राच्या मदतीने कामे करावी लागत असल्याने आयोगाच्या प्रभावी अंमलबजावणीस विभागीय कार्यालय असावे, असेही म्हटले आहे. राज्य महिला आयोगाने ५ वर्षांपूर्वीच प्रस्ताव महिला व बाल विकास विभागाकडे पाठवला मात्र विभागाने त्यावर टाळाटाळची भूमिका घेतली. आयोगाने सातत्याने घेतलेल्या पाठपुराव्यावर शेवटी विभागाने सप्टेंबर २०१५मध्ये प्रचलित यंत्रणा व क्षेत्रीय यंत्रणा यांमध्ये संघर्ष तयार होईल व आयोगाचा हेतू साध्य होणार नाही असे उत्तर देत प्रस्ताव फेटाळला आहे. > महिला आयोगाची कामेमहिला आयोगाला महाराष्ट्र राज्य अधिनियम १९९३मधील कलम १० अन्वये काही कामे नेमून दिली आहेत. त्यामध्ये महिलांना दिलेल्या संरक्षणात्मक उपाययोजना तपासणे, त्याची सखोल तपासणी, छाननी करणे. कार्यवाहीचा अहवाल करणे, महिलांना समान हक्क संरक्षण मिळते की नाही याची शहानिशा करणे, त्यांचा समाजातील स्तर उंचावणे आदी. ही सर्व कर्तव्ये एकाच कार्यालयातून होणे शक्य नाही तेव्हा विभागीय कार्यालयांची आवश्यकता अधोरेखित होते. मात्र शासन महिला प्रश्नांवर अद्यापही उदासीनच आहे. समाजात वावरत असताना स्त्रीला कुठे ना कुठे अन्यायाला सामोरे जावेच लागते. तेव्हा अशा अन्यायग्रस्त, पीडित महिलांच्या तक्रारीवर लवकरात लवकर सुनावणी होऊन त्यांना न्याय मिळावा. राज्य महिला आयोगाची स्थापना झाली. मात्र सद्य:स्थितीत महिला आयोगाचे केवळ मुंबई येथेच कार्यालय आहे. > महिला आयोगाकडे पायाभूत सुविधा, आवश्यक मनुष्यबळ आणि आर्थिक तरतूद हीच तोकडी आहे. त्यामुळे अर्थातच अशा प्रकारच्या आयोगाचे केंद्रीकरण होते. त्यामुळे विभागीय कार्यालये सुरू करण्यासाठी आपल्याला या सोयी सुविधांची मागणीचा पाठपुरावा करावा लागणार आहे. जनवादी महिला संघटनेच्यावतीने आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून यासाठी मागणी करत आहोत. महिलांच्या दृष्टीने अशी विभागीयच नव्हे तर जिल्हास्तरावर कार्यालये होण्याची गरज आहे.- किरण मोघे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या