शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

नळांना तोट्या बसवा... पाणी वाचवा!

By admin | Published: May 14, 2016 2:58 AM

सध्याचे जलसंकट लक्षात घेता ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन राज्यभरात पाणी बचतीसाठी नळांना तोट्या बसविण्याची मोहीम सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबई : सध्याचे जलसंकट लक्षात घेता ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन राज्यभरात पाणी बचतीसाठी नळांना तोट्या बसविण्याची मोहीम सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सातारा, सोलापूर, औरंगाबाद आदी शहरात हे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.पाण्याचे महत्त्व आता कळून चुकल्याने सातारा शहरातील युवक, महिला पाणी बचतीसाठी विविध उपाय करत आहेत. निमिश शहा यांनी शहरातील विविध भागांतील नळांना तोट्या बसवून वाया जाणारे पाणी वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.जलसाक्षरतेसाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘जलमित्र अभियाना’ला विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे पाण्याचे मोल समजू लागले आहे. त्यामुळे पाणी बचतीची चळवळ सुरू झाली आहे. ‘जलमित्र अभियान’अंतर्गत साताऱ्यातील निमिश शहा यांनी मित्रांना घेऊन सदर बझार येथील हौसिंग सोेसायटी, बंगले, झोपडपट्टी या भागात फिरून तोट्या नसलेल्या नळांचा सर्व्हे केला. त्यानंतर एक प्लंबर बरोबर घेऊन त्यांनी जवळपास वीस नळांना तोट्या बसविल्या. जलसाक्षरतेसाठी औरंगाबाद येथील जलमित्र समोर आले आहेत. ज्यांच्याकडील नळाची तोटी खराब असेल, पाईपमधून पाणी गळत असेल, अशा नागरिकांनी जर या जलमित्रांना फोन केला तर हे जलमित्र येऊन कोणतेही शुल्क न घेता ते दुरुस्त करून देत आहेत. शेकडो लिटर पाणी वाया जाऊ नये, यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात औरंगाबादचे मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांनी आवाहन केले आहे की, नळाची तोटी खराब आहे, तिची दुरुस्ती होत नसल्याने शेकडो लिटर पाणी वाहून जात आहे. दुरुस्तीअभावी जर पाणी वाया जात असेल तर हे दुर्दैव आहे. यासाठी आम्ही प्लंबरचे पथक तयार केले आहे.सोलापुरात शाब्दी सोशल ग्रुपच्या वतीने सार्वजनिक नळांना तोट्या बसविण्याची मोहीम हाती घेतली. आजवर या ग्रुपच्या वतीने किशननगर, मौलाली चौक, कुर्बान हुसेननगर आदी भागातील ७० नळांना तोट्या बसविण्यात आल्याची माहिती रसूल पठाण यांनी ‘लोकमत’ ला दिली. (प्रतिनिधी)पाणीटंचाई यू ट्यूबवर : पाणीटंचाईच्या दाहकतेचे चित्र समोर येण्यासाठी जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयातील स्वराज्य पथनाट्य गु्रपच्या काही तरुणांनी एकत्रित येऊन जनजागृतीपर गाण्याचा व्हिडीओ यू ट्यूबवर अपलोड केला आहे. यू ट्यूबवर ‘सेव्ह द ट्री, सेव्ह द वॉटर, एमजेसी जळगाव’ ही लिंक टाकल्यास हा चार मिनिटांचा व्हिडीओ पाहावयास मिळतो. सध्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर देखील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.लक्षवेधी : जागतिक तज्ज्ञांच्या मते भारताची लोकसंख्या २०२५ पर्यंत १५० कोटी होणार आहे. माणसाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी माणसी १५० लिटरपेक्षा अधिक पाणी वापरलं जातं. नागपूर, पुणे आणि मुंबईसारख्या शहरात हेच प्रमाण २०० लिटरपर्यंत आहे. पाण्याचा असाच वापर होत राहिल्यास पाणी समस्या आणखी उग्र होणार आहे.