शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Magnetic Maharashtra : प्रिंट मीडिया भविष्यातही प्रभावी राहील; 'लोकमत'च्या ऋषी दर्डा यांचा ठाम विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 19:37 IST

आज सगळेच जण डिजिटलबद्दल बोलतात. प्रत्येक उद्योगात डिजिटल जोरात आहे. बातम्यांचं जगही त्याला अपवाद नाही. पण वर्तमानपत्रं, अर्थात प्रिंट मीडियाही यापुढच्या काळात तितकाच प्रभावी राहील, असा विश्वास लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी आज व्यक्त केला.

मुंबई - आज सगळेच जण डिजिटलबद्दल बोलतात. प्रत्येक उद्योगात डिजिटल जोरात आहे. बातम्यांचं जगही त्याला अपवाद नाही. पण वर्तमानपत्रं, अर्थात प्रिंट मीडियाही यापुढच्या काळात तितकाच प्रभावी राहील, असा विश्वास लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी आज व्यक्त केला. मॅग्नेटिक महाराष्ट्र समिटमध्ये 'मीडियाः शेपिंग द फ्युचर ऑफ इन्फॉर्मेशन अँड एन्टरटेन्मेंट' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

पाच वर्षांपूर्वी ट्रेनच्या एखाद्या डब्यात १०० जण पेपर वाचताना दिसायचे. आज ही संख्या २० वर आली आहे. वृत्तपत्रांची जागा स्मार्टफोनने घेतलीय, पण वृत्तपत्रांवरचा विश्वास जराही कमी झालेला नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. कमी किंमत आणि सोयीस्करपणे - अगदी घराच्या दारात उपलब्ध होत असल्यानं  वृत्तपत्रं जनतेच्या मनात घर करून आहे. त्यामुळे या माध्यमाबाबत लोकमत सकारात्मक असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

या चर्चासत्रात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, दिग्दर्शक रितेश सिधवानी, व्हायकॉम 18चे ग्रूप सीईओ सुधांशू वत्स, रिपब्लिक टीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक अर्णब गोस्वामी आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे कन्टेंट हेड विजय सुब्रमण्यम सहभागी झाले होते. हे सगळ्यांचा भर डिजिटल मीडियावर असताना, ऋषी दर्डा यांनी वर्तमानपत्रांची - प्रिंट मीडियाची ताकद वर्णन केली. लोकमतचे ३०० वार्ताहर महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातील बातम्या देण्यासाठी सज्ज आहेत आणि त्या वाचकांनाही हव्यात, असं त्यांनी आवर्जून सांगितलं.

प्रिंट मीडियासोबतच इंटरनेट, डिजिटल मीडियाबाबतही लोकमत समूह जागरूक आहे आणि त्यातही चांगली गुंतवणूक करत असल्याचं ऋषी दर्डा म्हणाले. पुढच्या चार ते पाच वर्षांत ग्रामीण भागात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या शहरी इंटरनेट यूजर्सपेक्षा जास्त असेल. हे लक्षात घेऊन डिजिटल कन्टेंट आणि व्हिडिओवरही लक्ष केंद्रीत केल्याचं त्यांनी सांगितलं.   

दरम्यान, चित्रपट (बॉलिवूड), टीव्ही, वेब, वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने राज्यात 'मीडिया हब' तयार करणं गरजेचं असल्याचं मत शाहरुख खाननं या चर्चासत्रात मांडलं. मीडिया हे क्षेत्र वेगाने वाढत असून त्यातून रोजगाराच्या मोठ्या संधीही निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याची ताकद मीडियामध्ये असल्याचा विश्वास सर्वच वक्त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Magnetic Maharashtraमॅग्नेटिक महाराष्ट्रRishi Dardaऋषी दर्डाbusinessव्यवसायMediaमाध्यमे