शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
2
"भरोसा दिल से, भाजपा फिर से..."; हरियाणातील प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
3
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
4
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
5
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
6
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
7
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
8
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर
9
काँग्रेस आमदाराच्या मुलाकडून कायद्याची पायमल्ली; जेलमध्ये असतानाही बाहेर फिरताना दिसला अन्...
10
बांगलादेशमध्ये सरकारकडून दूर्गा पूजेवर बंदी, मंडळांना जिझिया कर देण्याचे आदेश, काही ठिकाणी मूर्ती तोडल्या
11
भारताने पुढील महामारीची तयारी करावी; NITI आयोगाचा धडकी भरवणारा अहवाल
12
वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!
13
मतदानापूर्वीच भाजपला मोठा धक्का, अशोक तंवर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
14
Bigg Boss 18 : 'चुम्मा चुम्मा दे दे...' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी घेतली पत्नीची पप्पी, हिंदी 'बिग बॉस'मध्ये होणार एन्ट्री
15
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
16
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
17
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
18
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
19
Irani Cup 2024 : 'फर्स्ट क्लास' कामगिरी; Abhimanyu Easwaran नं चौथ्या डावात ठोकली तिसरी सेंच्युरी
20
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती

महाआघाडी सरकार शेतकऱ्यांना दोन टप्प्यात देणार कर्जमाफी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 5:32 AM

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांकडून कर्जाची आकडेवारी मागवली होती. सुरुवातीला ही आकडेवारी ८९ हजार कोटींची होती. नंतर विविध नियम आणि अटी टाकण्यात आल्या. तेव्हा बँकांनी स्वत:हून किमान १६ लाख खाते रद्द केले.

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन टप्प्यात कर्जमाफी देण्याची योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आखली आहे. त्यासाठी पहिला टप्पा आर्थिक वर्ष संपण्याच्या आत तर दुसरा टप्पा १ एप्रिल २०२० नंतर पूर्ण केला जाईल. महाआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याचे विश्वसनीय सुत्रांना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी नागपुरात येताच जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, नवाब मालिक, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांच्यासमवेत एक बैठक घेतली. या बैठकीत शेतकºयांच्या कर्जमाफीचा विषय निघाला. त्यावर सविस्तर चर्चा झाली. तत्पूर्वी अजित पवार यांनी वित्त विभागाच्या अधिकाºयांकडून राज्याच्या आर्थिक स्थितीची माहिती घेतली. कर्जमाफीसाठी किती पैसे लागतील, याचा अंदाज घेण्यात आला. तसेच विविध बँकांकडून शेतकºयांकडील कर्जाची माहिती मागविण्यात आली आहे.

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांकडून कर्जाची आकडेवारी मागवली होती. सुरुवातीला ही आकडेवारी ८९ हजार कोटींची होती. नंतर विविध नियम आणि अटी टाकण्यात आल्या. तेव्हा बँकांनी स्वत:हून किमान १६ लाख खाते रद्द केले. कर्जमाफीचा आकडा साठ हजार कोटीवर आला. त्यापैकी काही कर्ज फडणवीस सरकारने माफ केले होते. या अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होणार नाही. मात्र अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर जानेवारी महिन्यात कर्जमाफीची घोषणा होईल, असे सूत्रांनी सांगितले. राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असली तरी कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी द्यायची आणि शेतकºयांना चिंतामुक्त करायचे, अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी