शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 16:09 IST

Lok Sabha Election ( Marathi News ) : देशात यंदा लोकसभा निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत ...

Lok Sabha Election ( Marathi News ) : देशात यंदा लोकसभा निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत असून यातील पाच टप्प्यांतील मतदान पूर्ण झालं आहे. महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता कोणत्या मतदारसंघात कुणाचा विजय होणार, यावर मतदारसंघातील उत्साही कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागत आहेत. तसंच सर्वच राजकीय पक्षांचे नेते या निवडणुकीच्या निकालाबाबत आपला अंदाज व्यक्त करत आहेत. महायुतीच्या बहुतांश नेत्यांकडून ४५ प्लसचा दावाही केला जात आहे. अशातच एनडीएतील घटकपक्ष असलेल्या आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रात यावेळी लोकसभा निवडणुकीत 'काँटे की टक्कर' झाल्याचं रामदास आठवले यांनी मान्य केलं आहे. तसंच महायुतीला राज्यात ३५ ते ४० जागा मिळतील, असा दावाही आठवले यांनी केला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांकडून वारंवार ४५ पारचा नारा दिला जात असताना आठवले यांनी मात्र राज्यात चुरशीची लढत झाल्याचं मान्य केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत

जानकरांनी काय म्हटलं होतं?

"राज्यात फिरताना मला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत लोकांमध्ये काही प्रमाणात सहानुभूती असल्याचं जाणवलं," असं नुकतंच एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना रासपचे अध्यक्ष आणि परभणी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. मात्र असं असलं तरी पवार-ठाकरेंकडे ग्राऊंडवर केडर नसल्याने या सहानुभूतीचं मतात रुपांतर होणार नाही आणि राज्यात महायुती ४२ जागा जिंकेल, असा अंदाज जानकर यांनी वर्तवला.

"महाराष्ट्रात बीड आणि परभणी या दोन लोकसभा मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात जातीवाद झाला. तिकडे पंकजा मुंडे आणि इकडे मी असे दोन्ही ओबीसी उमेदवार असल्याने महाविकास आघाडीने जातीवादाचे षडयंत्र केले. एक व्यक्ती या दोनच मतदारसंघांमध्ये फिरला. मात्र असं असलं तरी परभणीत मी ३० ते ४० हजार मतांनी विजयी होईल आणि बीडमध्येही पंकजा मुंडे यांचाच विजय होईल," असंही महादेव जानकर यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४