शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
4
Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निकालानंतर Reliance Industries मध्ये घसरण
5
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
6
लोणकर बंधूंकडून शूटर्सला पैशांचा पुरवठा, शस्त्रही दिले; पुण्याच्या डेअरीत बसून केले प्लॅनिंग
7
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
8
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
9
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
10
महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
11
RIL Q2 Results: मुकेश अंबानींच्या रिलायन्सवर मोठी अपडेट; नफा ५ टक्क्यांनी घसरला, पाहा संपूर्ण रिपोर्टकार्ड
12
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
13
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
14
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
15
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
16
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
17
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
18
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
19
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
20
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!

अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 7:50 AM

Maharashtra Politics: अखिलेश यादव महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. काहीही नसताना सपाचे महाराष्ट्रात दोन आमदार आहेत. सपा महाराष्ट्रात ताकदीने आली तर त्याचा फटका शरद पवार, ओवेसी, काँग्रेसलाच सर्वाधिक बसणार...

लखनऊ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि महाशक्ती अशा तीन आघाड्यांमध्ये फाईट होणार आहे. यामुळे एकतर त्रिशंकू स्थिती किंवा तिसऱ्या आघाडीने मते फोडल्यामुळे सर्वच जागांवर अटीतटीची लढत होऊन मविआ आणि महायुती सत्तास्थापनेसाठी देखील काठावर पास होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच महायुती आणि आघाडी या दोघांनाही ५०-५० टक्के संधी दिसत आहे. यातच या परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी उत्तर प्रदेशचा समाजवादी पक्ष या निवडणुकीला साधण्याच्या प्रयत्नात आहे. 

यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या सपाने अन्य राज्यांत विस्तार करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. १८ ऑक्टोबरला अखिलेश यादव मिशन महाराष्ट्राची सुरुवात करणार आहेत. मालेगावमध्ये ते एक मोठी रॅली करणार आहेत. मालेगाव हे मुस्लिम बहुल आहे. यानंतर १९ तारखेला धुळ्यातही ते राजकीय सभा घेणार आहेत. 

महाराष्ट्रात काहीही नसताना सपाचे दोन आमदार आहेत. मानखूर्द शिवाजी नगरमधून अबू आझमी आणि भिवंडी पूर्वहून रईस शेख. उत्तर प्रदेशातून कोणीही प्रचाराला आलेले नसताना  दोन आमदार तर लक्ष घातले तर किती? असा प्रश्न सपा प्रमुखांना खुणावत आहे. महाराष्ट्रात सपा जवळपास ३० जागांवर आपली व्होटबँक असल्याचा दावा करत आहे. यातून सपा मविआकडून १०-१२ जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सपाने २००९ मध्ये ४ जागा जिंकल्या होत्या. परंतू, २०१४ मध्ये एकच जागा आली होती. 

सपा महाराष्ट्रात आलेल्या सर्वात मोठा फटका हा एआयएमआयएमच्या ओवेसी यांना आणि शरद पवार-अजित पवारांच्या राष्ट्रवादीला व काँग्रेसला बसणार आहे. AIMIM चे धुळे शहर आणि मालेगाव मध्य अशा दोन ठिकाणी २०१९ मध्ये आमदार निवडून आले होते. तिथेच अखिलेश यादव लक्ष ठेवून आहेत. तिथे मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे सपा हे मतदारसंघ साधण्याच्या प्रयत्नात आहे. महत्वाची बाब म्हणजे सपाच्या धुळ्यातील उमेदवाराला २०१९ मध्ये केवळ ८०० मते मिळाली होती. 

सपाला मविआत जागा दिल्यास त्याचा फटका राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच जास्त बसणार आहे. कारण या दोघांच्याही अल्पसंख्यांक बहुल असलेल्या मतदारसंघांवर दावा आहे. या जागा सपाला सोडाव्या लागणार आहेत. जर मविआत सपा आली नाही तर या दोघांची मते सपाला जाऊन मतविभागणीचा फटका बसू शकतो. तिसरी आघाडी आल्याने आधीच राज्यातील राजकीय परिस्थिती बदललेली असताना आता सपाच्या दबावामुळे मविआमध्ये टेन्शनचे वातावरण आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Akhilesh Yadavअखिलेश यादवSharad Pawarशरद पवारAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनSamajwadi Partyसमाजवादी पार्टी