शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 07:51 IST

Maharashtra Politics: अखिलेश यादव महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. काहीही नसताना सपाचे महाराष्ट्रात दोन आमदार आहेत. सपा महाराष्ट्रात ताकदीने आली तर त्याचा फटका शरद पवार, ओवेसी, काँग्रेसलाच सर्वाधिक बसणार...

लखनऊ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि महाशक्ती अशा तीन आघाड्यांमध्ये फाईट होणार आहे. यामुळे एकतर त्रिशंकू स्थिती किंवा तिसऱ्या आघाडीने मते फोडल्यामुळे सर्वच जागांवर अटीतटीची लढत होऊन मविआ आणि महायुती सत्तास्थापनेसाठी देखील काठावर पास होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच महायुती आणि आघाडी या दोघांनाही ५०-५० टक्के संधी दिसत आहे. यातच या परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी उत्तर प्रदेशचा समाजवादी पक्ष या निवडणुकीला साधण्याच्या प्रयत्नात आहे. 

यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या सपाने अन्य राज्यांत विस्तार करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. १८ ऑक्टोबरला अखिलेश यादव मिशन महाराष्ट्राची सुरुवात करणार आहेत. मालेगावमध्ये ते एक मोठी रॅली करणार आहेत. मालेगाव हे मुस्लिम बहुल आहे. यानंतर १९ तारखेला धुळ्यातही ते राजकीय सभा घेणार आहेत. 

महाराष्ट्रात काहीही नसताना सपाचे दोन आमदार आहेत. मानखूर्द शिवाजी नगरमधून अबू आझमी आणि भिवंडी पूर्वहून रईस शेख. उत्तर प्रदेशातून कोणीही प्रचाराला आलेले नसताना  दोन आमदार तर लक्ष घातले तर किती? असा प्रश्न सपा प्रमुखांना खुणावत आहे. महाराष्ट्रात सपा जवळपास ३० जागांवर आपली व्होटबँक असल्याचा दावा करत आहे. यातून सपा मविआकडून १०-१२ जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सपाने २००९ मध्ये ४ जागा जिंकल्या होत्या. परंतू, २०१४ मध्ये एकच जागा आली होती. 

सपा महाराष्ट्रात आलेल्या सर्वात मोठा फटका हा एआयएमआयएमच्या ओवेसी यांना आणि शरद पवार-अजित पवारांच्या राष्ट्रवादीला व काँग्रेसला बसणार आहे. AIMIM चे धुळे शहर आणि मालेगाव मध्य अशा दोन ठिकाणी २०१९ मध्ये आमदार निवडून आले होते. तिथेच अखिलेश यादव लक्ष ठेवून आहेत. तिथे मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे सपा हे मतदारसंघ साधण्याच्या प्रयत्नात आहे. महत्वाची बाब म्हणजे सपाच्या धुळ्यातील उमेदवाराला २०१९ मध्ये केवळ ८०० मते मिळाली होती. 

सपाला मविआत जागा दिल्यास त्याचा फटका राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच जास्त बसणार आहे. कारण या दोघांच्याही अल्पसंख्यांक बहुल असलेल्या मतदारसंघांवर दावा आहे. या जागा सपाला सोडाव्या लागणार आहेत. जर मविआत सपा आली नाही तर या दोघांची मते सपाला जाऊन मतविभागणीचा फटका बसू शकतो. तिसरी आघाडी आल्याने आधीच राज्यातील राजकीय परिस्थिती बदललेली असताना आता सपाच्या दबावामुळे मविआमध्ये टेन्शनचे वातावरण आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Akhilesh Yadavअखिलेश यादवSharad Pawarशरद पवारAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनSamajwadi Partyसमाजवादी पार्टी