शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचं अमित शाहांच कारस्थान, संजय राऊत यांचा सनसनाटी आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 12:40 IST

Maharashtra Assembly Election 2024;

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं कारस्थान भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रचलं असल्याचा सनसनाटी आरोप ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच यासाठी अमित शाह यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरल्याचा दावाही त्यांनी केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे, तर २६ नोव्हेंबर रोजी जुन्या विधानसभेची मुदत संपत आहे, त्याचा आधार घेत संजय राऊत यांनी हा दावा केला आहे.

संजय राऊत आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामधील नवं सरकार सत्तेवर येऊ नये, यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाला हातीशी धरून पुढची तयारी केली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आहे. २३ नोव्हेंबर रोजी निकाल आहे आणि २६ तारखेपर्यंत सरकार स्थापन करायचं आहे. एवढा कमी वेळ खरंतर दिला जात नाही.आतापर्यंतचा इतिहास तुम्ही पाहिला असेल.

संजय राऊत पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी निवडणूक लढतेय आणि जिंकणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी असेल, तर संपूर्ण निकाल लागेपर्यंत २४ तारीख उजाडेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जिंकलेले आमदार इथे येतील. त्यांना इथे पोहोचायला एक दिवस लागेल. २६ तारखेला बैठका घेणं विधिमंडळ पक्षाचे नेते निवडणं. राज्यपालांकडे दावा करणं, यासाठी किमान वेळ लागतो, तो दिलेला नाही. २६ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन होऊ शकलं नाही, पुढे सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लावायची, असं फार मोठं कारस्थान अमित शाह यांनी रचलं आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात स्वाभिमानी लोकांचं सरकार बनू द्यायचं नाही. हे राज्य महाराष्ट्राच्या शत्रूंच्याच हातात राहावं. सूरत, अहमदाबाद आणि गुवाहाटीला ज्यांनी कांड केली. त्यांच्या हातात राज्य राहावं, यासाठी राष्ट्रपती राजवट लगेच  लावायची म्हणून फक्त दोन दिवसांचा कालावधी सरकार स्थापन करण्यासाठी दिलेला आहे. लोकशाहीच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचा घाणेरडा व्यवहार कधी झालेला नाही, असा व्यवहार अमित शाह करताहेत. ते महाराष्ट्राचे क्रमांक एकचे शत्रू आहेत. बाकी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे महाराष्ट्राच्या दुश्मनांचे हस्तक आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतAmit Shahअमित शाहMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग