शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजप पाठिंबा देणार? बाळा नांदगावकरांचे महत्वाचे वक्तव्य
2
माहिममध्ये रंगणार तिरंगी लढत, ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर
3
प्रियंका गांधी यांनी वायनाड येथून भरला उमेदवारी अर्ज, काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
4
एकाच घरात आमदार, खासदार पदे; राज्याच्या राजकारणात फक्त 'या' घराण्यांचं वर्चस्व?
5
दिवाळीत Cash मध्ये केवळ 'इतकं'च खरेदी करू शकता Gold; जास्त घेतल्यास द्यावी लागेल 'ही' माहिती
6
जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?
7
'अचानक सर्वकाही ठीक होईल, या भ्रमात राहू नका', भारत-चीन करारावर व्हीके सिंह स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राधानगरीच्या के.पी. पाटलांनी ठाकरे गटात केला प्रवेश; शिंदे गटाच्या आबिटकरांविरोधात रिंगणात उतरणार
9
महायुतीचे आतापर्यंत एकूण किती उमेदवार जाहीर? किती जागांवर निर्णय बाकी? कधी होणार अंतिम?
10
सर्व विक्रम उद्ध्वस्त करत सोनं 81000 हजार पार; GST सह चांदी 102125 रुपयांवर, पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
अजित पवारांनी पहिल्या यादीत नवाब मलिकांचे नाव टाळले? भाजपचा विरोध की अन्य कारण...
12
Corona Virus : कोरोनातून बरं झालेल्या लोकांना हार्ट अटॅक, स्ट्रोकचा दुप्पट धोका?; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा
13
NCP Vidhan Sabha Candidate List : काँग्रेसनं नाकारलं, अजित पवारांनी स्वीकारलं! ते दोन विद्ममान आमदार कोण?
14
कागलचा 'श्रावणबाळ' पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, हसन मुश्रीफ यांना उमेदवारी
15
Ajit Pawar: राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर; अजित पवार बारामतीतूनच लढणार, ३८ नावांची घोषणा!
16
Airtel Sunil Mittal Birthday : एकेकाळी बनवायचे सायकलचे पार्ट्स, अशी उभी केली Airtel; कसा होत सुनील मित्तल यांचा प्रवास
17
PAK vs ENG FINAL : रावळपिंडी कसोटीसाठी पाकिस्तानने अवलंबवला भारताचा फॉर्म्युला; इंग्लंडची कोंडी!
18
उमेदवारी यादी आली, CM शिंदेंची मोठी खेळी! खास माणूस जरांगेंना भेटला? पाठिंब्यासाठी हालचाली?
19
“अंतरवाली सराटी श्रद्धास्थान, बीडमधील सर्व जागा निवडून आणू”; बजरंग सोनावणे जरांगेंना भेटले
20
"आपलं काम केलं नाही तर आपणही त्यांचं काम करायचं नाही’’, शिंदेंच्या उमेदवाराचा भाजपाला इशारा

“उद्धव ठाकरे केवळ २ वेळा आले, भेटीसाठी १० मिनिटे वेळ दिला नाही”; महंतांचा ठाकरे गटाला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:40 PM

Maharashtra Assembly Election 2024: पक्षवाढीसाठी राज्यभर दौरे केले. बंजारा समाजात नवचैतन्य आणले. गेल्या १० महिन्यात हजारो मेसेज, फोन केले. परंतु, भेटीबाबत अद्यापही कोणताचा रिप्लाय आला नाही, असा दावा बंजारा समाजाच्या महंतांनी केला आहे.

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाने ९९ जणांची यादी जाहीर करत बाजी मारल्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि मनसेने उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला असून, लवकरच उमेदवारी यादी येऊ शकते, असे म्हटले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाजाच्या महंतांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १३ खासदार आणि ४० आमदारांनी बंडखोरी केली आणि नवीन पक्ष स्थापन केला. उद्धव ठाकरे यांच्याकडून केवळ पक्ष नव्हे, तर पक्षचिन्हही हिसकावून घेतले. अशा परिस्थिती प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते उद्धव ठाकरे यांना सहकार्य करावे. समाजाचे त्यांच्या माध्यमातून भले व्हावे, समाजाला न्याय मिळावा, या उद्देशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. यानंतर पक्षवाढीसाठी राज्यभर दौरे केले. समाजात नवचैतन्य निर्माण केले, असा दावा पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी केला. 

गेल्या १० ते १२ महिन्यांपासून मला एकदाही वेळ दिलेली नाही

एका बाजूला माझे हे काम सुरू असताना उद्धव ठाकरे एकदा पोहरादेवीच्या दर्शनाला आले. त्यानंतर जनसंवाद यात्रेला संबोधित करण्यासाठी करंजा, वाशिमला आले. अनेकदा उद्धव ठाकरे यांना मेसेज केले. पक्षवाढीसाठी आणि समाजाच्या हितासाठी आम्हाला एकदा तुमची भेट हवी आहे. उद्धव ठाकरे यांच्या पीए यांना हजारो वेळा मेसेज टाकले, फोन केले. परंतु, गेल्या १० ते १२ महिन्यांपासून मला एकदाही वेळ दिलेली नाही. माझ्या फोनना, मेसेजला, विनंतीला कोणताच रिप्लाय देण्यात आलेला नाही, अशी हकिकत महंत सुनील महाराज यांनी कथन केली.

दरम्यान,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असली तरी ते खरोखरच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे आहे, हे माझ्या लक्षात आले. विधानसभा निवडणुकीची तिकीटे, उमेदवारी जाहीर होत आहे. परंतु, ठाकरे गटाची बंजारा समाजाला प्रतिनिधित्व द्यायची तयारी किंवा इच्छा दिसत नाही. शरद पवार यांनी बंजारा समाजाच्या दोन जणांना उमेदवारी दिली आहे, त्याबाबत त्यांचे आभार मानतो. परंतु, ठाकरे गटात बंजारा समाजाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे ठाकरे गटातून बाहेर पडत आहे, असे महंत सुनील महाराज यांनी स्पष्ट केले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंजारा महंत सुनील महाराज  यांनी हा निर्णय घेतल्याने याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना