शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

महाविकास आघाडीमुळे काँग्रेस अन् शरद पवारांचा फायदा; उद्धव ठाकरेंनी काय गमावलं?

By प्रविण मरगळे | Published: August 29, 2024 1:59 PM

मविआमुळे काँग्रेस-शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली संजीवनी, उद्धव ठाकरेंना मात्र नुकसानच सहन करावं लागले. 

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाची तयारी सुरू झाली आहे. त्यातच सध्याची राजकीय परिस्थिती महाविकास आघाडीसाठी अनुकूल असल्याचं काँग्रेसच्या सर्व्हेतून पुढे आले आहे. मात्र हा सर्व्हे भाजपासह काँग्रेसचा घटकपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे गटानेही नाकारला आहे. 

महाविकास आघाडीत सध्या जागावाटपाची प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसला २८८ मतदारसंघातून १६३३ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. आम्हाला चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा होती मात्र इतक्या संख्येने इच्छुक काँग्रेसकडे उमेदवारी मागतील हे अपेक्षित नव्हतं असं ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले. मुंबई काँग्रेसकडे २५६ अर्ज आले आहेत. विदर्भातून ४८५, उत्तर महाराष्ट्रात १४१, मराठवाडा ३२५, कोकण १२३, पश्चिम महाराष्ट्रातून ३०३ इच्छुकांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे.

मुंबईतल्या ३६ जागांबाबत २-३ दिवसांत निर्णय होईल. मागच्या आठवड्यात मविआ नेते बैठकीला बसले होते. ही चर्चा अंतिम टप्प्यात आहे. लवकरच मुंबईतल्या ३६ जागांबाबत फॉर्म्युला ठरू शकतो. आम्ही राज्यातील २८८ जागांवर मागील महिन्यात सर्व्हे केला. सध्याची परिस्थिती महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे. त्यात काँग्रेसला ८०-८५ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ५५-६०, शिवसेना ठाकरे गट ३०-३५, भाजपा ६०-६२ तर शिवसेना एकनाथ शिंदे ३०-३२ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ८-९ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

जागावाटपावर वाद होणार?

येत्या विधानसभेत काँग्रेसला १३० जागांवर निवडणूक लढायची आहे. तर मित्र पक्ष राष्ट्रवादीला ७५, ठाकरे गटाला ७५ आणि इतर जागा छोट्या पक्षांना देण्याची मागणी होतेय. परंतु हे जागावाटप उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मान्य होणार का हा प्रश्न आहे. 

काँग्रेसच्या सर्व्हेवर भाजपा-ठाकरे गट काय म्हणाले?

काँग्रेसच्या सर्व्हेतील आकडे उद्धव ठाकरे गटावर दबाव आणण्यासाठी समोर आलेत. उद्धव ठाकरे सातत्याने स्वत:ला मुख्यमंत्रिपदासाठी समोर आणत आहेत. जर ठाकरेंना ३०-३५ जागा मिळणार असतील तर ते मुख्यमंत्रिपदावर दावा करू शकत नाहीत असं भाजपा नेत्याने म्हटलं तर महाविकास आघाडीत अद्याप आम्ही किती जागा लढवणार हे ठरलेले नाही. आम्ही सन्मानजनक जागा घेऊ आणि मोठ्या फरकाने जिंकू अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी काँग्रेसच्या सर्व्हेवर दिली. 

महाविकास आघाडीमुळे काँग्रेस-शरद पवारांचा फायदा, उद्धव ठाकरेंना फटका

२०१९ च्या निकालात शिवसेना-भाजपा महायुतीला जनतेनं कौल दिला. मात्र मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षात बिनसलं. त्यानंतर राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीची स्थापना केली. राज्यात मविआचे सरकार आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. मात्र अवघ्या अडीच वर्षात हे सरकार कोसळले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेतली. त्यामुळे शिवसेनेत २ गट झाले. २०१९ च्या निवडणुकीत १८ खासदार निवडून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंना २०२४ च्या निवडणुकीत ९ खासदारांवर समाधान मानावे लागले तर काँग्रेसनं एका खासदारावरून १३ खासदारांपर्यंत मजल मारली. शरद पवारांनीही ४ खासदारांवरून ८ खासदार निवडून आणले. त्यामुळे महाविकास आघाडीमुळे काँग्रेस-शरद पवारांचा फायदा झाला मात्र उद्धव ठाकरेंच्या हातून पक्ष गेला. खासदारांची संख्याही कमी झाली. मागील निवडणुकीत ५५ आमदार निवडून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंचे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत किती आमदार निवडून येतात ते पाहणे गरजेचे आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदे