शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

असा एक तरी सर्व्हे दाखवा ज्यात...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जमिनीवरची परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 20:00 IST

विधानसभा निकालानंतर स्पष्ट बहुमत मिळेल. लोक आम्हाला निवडून देतील अशी परिस्थिती आहे. जमिनीवरची परिस्थिती बदलली आहे हे दिसून येते, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. 

मुंबई - भाजपाचा सर्व्हे मला माहिती नाही; पण जगाला, देशाला, पत्रकारांना माहिती पडतो. हा सर्व्हे कोणता..? मला असा एक तरी सर्व्हे दाखवा त्यात काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला इतक्या जागा मिळतील असं दाखवलं आहे. भाजपाच्या सर्व्हेत पक्षाला संतोषजनक वातावरण आहे. प्रत्येक सर्व्हेत आम्हाला आमच्या जागा वाढलेल्या दिसताहेत. कुठेही नकरात्मक सर्व्हे नाही. अतिशय पॉझिटिव्ह सर्व्हे असून विजयाकडे घेऊन जाणारा हा सर्व्हे आहे, असं विधान भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि सहयोगी संपादक यदु जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभेवेळी अपेक्षाकृत आमच्या लोकांची नाराजी जास्त होती. आम्ही अजितदादांना सोबत घेतले तेव्हा इतकी नाराजी असेल वाटलं नव्हतं. परंतु आज तशी परिस्थिती नाही. बेरजेचे राजकारण काय आहे हे आम्ही आमच्या मतदारांना, संघटनांना समजावू शकलो आहोत. त्यामुळे ८० टक्के मनाने, २० टक्के शिस्तीने मतदार आमच्यासोबत आहेत. अजितदादा सगळ्या आमदारांना घेऊन सिद्धीविनायकला जातात. जेव्हा आम्ही हिंदुत्व मांडतो तेव्हा ते कधी प्रतिवाद करत नाहीत. अजितदादा आमच्याकडे आल्याने त्यांच्यात परिवर्तन होतंय हे दिसून येतं. ही निवडणूक चुरशीची असेल. विधानसभा निकालानंतर स्पष्ट बहुमत मिळेल. लोक आम्हाला निवडून देतील अशी परिस्थिती आहे. जमिनीवरची परिस्थिती बदलली आहे हे दिसून येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

प्रत्येकाला आपापला पक्ष आहे, त्यामुळे जास्त जागा मिळाव्यात असा आग्रह असतो. कार्यकर्त्यांचाही असतो. महाविकास आघाडीशी तुलना करता आम्ही सामंजस्याने जागावाटप केले. पहिल्या २ चर्चांमध्ये आमचं २४० जागांचं वाटप झालं होतं. ४८ जागांपैकी ३८ जागांवर तिसऱ्या चर्चेत तोडगा निघाला. १० जागांवर निश्चितपणे आम्हाला त्रास झाला. शेवटी त्याचा निकालही आम्ही लावला आहे. महायुतीत आम्हाला १६०-१६५ जागांची अपेक्षा होती. परंतु १५२ जागा मिळाल्या. महायुतीत तीन पक्ष लढत असताना १५२ जागा मिळणे हेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे, असं फडणवीसांनी नमूद केलं. 

५० वर्षं राम मंदिराचं स्वप्न उराशी बाळगून आम्ही एक दिवस हे स्वप्न पूर्ण करू शकतो अशा ताकदीने काम करायचे. जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा राम मंदिर उभं राहिले. त्यामुळे शत प्रतिशत भाजपा एका दिवसात होऊ शकत नाही. लोकांचा विश्वास आम्हाला अधिक कमवावा लागेल. आज महाराष्ट्रात जे काही युतीचे राजकारण आहे त्याला पर्याय नाही. भाजपाची ताकद आहे, पण केवळ ताकदीवर निवडून येऊ शकतो का तर असं नाही. आम्हाला मित्रांची गरज आहे. त्यामुळे आम्ही मित्रांसोबत लढतोय असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. 

भाजपा तत्त्व पाळण्याचा प्रयत्न करतं, परंतु...

राजकारणात अनेकांना वाटतं, ही निवडणूक आपण लढलो नाही तर ही जीवनातील अंतिम निवडणूक आहे असं वाटते. अलीकडच्या काळात राजकीय कार्यकर्ते थांबण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे पक्षातून लोक जातात. सगळ्याच पक्षातून जात असतात पण सरसकट असं होत नाही. आज आमच्या पक्षात अनेकांनी अर्ज भरले, ते माघारी घेताहेत. भाजपात जे तत्त्व आम्ही सांगतो, ते पाळतोही. सत्तेचं राजकारण असल्याने जितकं जास्त असेल तितकं तत्त्व पाळण्याचा प्रयत्न करतो असं फडणवीसांनी म्हटलं. 

शरद पवारांमधील परिवर्तन स्वागतार्ह 

राजकारणाची जी दिशा मोदींनी बदलली, राजकीय नेते ईश्वराचे भक्त होते, धार्मिक होते पण ते लपून लपून करायचे. मंदिरात गेल्यावर पुरोगामी प्रतिमा खराब होतेय असं त्यांना वाटायचे. मोदींमुळे ते नेते मंदिरात उघड जाऊ लागले. वारीत जाणार, मंदिरात जाणार हे शरद पवारांचे परिवर्तन स्वागतार्ह आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला.

पाहा व्हिडिओ

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahayutiमहायुती