शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 12:55 IST

कार्यकर्त्यांचे मनोबल खचू नये यासाठी नेत्यांचे काम असते, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले त्यानंतर मनसेनं पलटवार केला आहे.

मुंबई - माहिम मतदारसंघात यंदा राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून पुन्हा सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आले आहे तर उद्धव ठाकरेंकडून महेश सावंत यांना उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे माहिम मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. अमित ठाकरेंना महायुतीचा पाठिंबा मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु सदा सरवणकर हे माघार घेण्यास तयार नव्हते. त्यात कार्यकर्त्यांना खचू न देणे ही नेत्याची जबाबदारी असते असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले त्यामुळे मनसेकडूनही त्यावर पलटवार केला आहे.

मनसे नेते यशवंत किल्लेदार म्हणाले की, माहिम मतदारसंघात आम्ही त्यांच्याकडे कुठलाही प्रस्ताव घेऊन गेलो नाही की या जागेवर तुम्ही माघार घ्या. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर लगेच आम्ही विधानसभेला स्वबळावर लढणार हे जाहीर केले होते. त्यामुळे माहिम जागेबाबत चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त जेव्हा तुमचा मुलगा लोकसभेला उभा होता तेव्हा राज ठाकरेंनी ठाण्यात सभा घेतली होती. आज आमचे राजू पाटील तिथे उभे आहेत. तुमच्याकडे थोडीही माणुसकी नाही तुम्ही त्यांच्याविरोधात उमेदवार उभे करता. तुमच्या मुलासाठी राजू पाटील आणि आमच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा नसतानाही त्यांनी काम केले. त्याची परतफेड करणे ही भावना तुमच्याकडे नाहीच, ते तुमच्या मनात मेलेले आहे. राज ठाकरेंचा स्वभाव प्रचंड वेगळा आहे. नातेसंबंध ते जपतात. वरळीतही मागील वेळी मनसेनं उमेदवार दिला नव्हता. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे हे संकुचित विचारांचे लोक आहेत अशी बोचरी टीका त्यांनी केली.

तसेच अंबरनाथमध्ये जे घडलं, ते म्हणजे लोकसभेला ज्याप्रकारे संकेत एकनाथ शिंदे यांनी विधानसभेबाबतीत दिले होते ते त्यांनी पाळले नाहीत. राजू पाटील आणि आमच्या तिकडच्या पदाधिकाऱ्यांची श्रीकांत शिंदेंचा प्रचार करण्याची इच्छा नव्हती. केवळ राज ठाकरेंनी हा निर्णय घेतल्यानंतर सर्व हेवेदावे, मतभेद विसरून त्यांनी श्रीकांत शिंदे यांचा प्रचार केला होता. आता विधानसभेला तिथे त्याची परतफेड करण्याची वेळ आली तेव्हा एकनाथ शिंदे अशी भूमिका घेत असतील तर ते आश्चर्यकारक आहे असं विधान मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी केले आहे.

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

लोकसभा निवडणुकीच्या वेळा आम्ही एकत्र होतो. माझी राज ठाकरेंशी चर्चादेखील झाली होती. मी त्यांना तेव्हाच विचारलं होतं की विधानसभेसाठी तुमची रणनीती काय असेल? त्यावेळी ते मला म्हणाले होते की, शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुतीची चर्चा होऊ दे. त्यानंतर आपण बोलूया, पण त्यांनी थेट उमेदवार देण्यास सुरुवात केली. (माहिममध्ये जेथून अमित ठाकरे लढणार आहेत,) तेथून आमचाही आमदार दोन-तीन टर्मपासून जिंकत आला आहे. सदा सरवणकर हे आमचे जुने सहकारी आणि कार्यकर्ता आहेत. ते आमचे आमदार आहेत. मी त्यांच्याशीही चर्चा केली. त्यांचे कार्यकर्ते निवडणूक लढवण्याबाबत खूपच आक्रमक आहेत. आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांचीही काळजी घ्यावी लागते. कार्यकर्त्यांचे मनोबल खचू नये हे देखील नेत्यांचे काम असते असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेmahim-acमाहीमmumbai regionमुंबई विधानसभा निवडणूक