शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 13:54 IST

Maharashtra Assembly Election 2024 Result: पुढील निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे लढण्याबाबतचा सूर काल झालेल्या ठाकरे गटाच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या बैठकीत उमटला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडी फुटणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांना मोठा धक्का बसला आहे. तसेच त्या पराभवाची कारणमीमांसा ही महाविकास आघाडीतील नेते आणि घटक पक्षांकडून सुरू आहे. दरम्यान, पुढील निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे लढण्याबाबतचा सूर काल झालेल्या ठाकरे गटाच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या बैठकीत उमटला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडी फुटणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये पुढील निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढण्याबाबत सुरू झालेल्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, या बातम्या निराधार आहेत. लोकसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवली होती. तसेच आम्हाला चांगलं यश मिळालं होतं. ३० हून अधिक जागा जिंकणं ही मोठी गोष्ट होती. तेव्हाही आम्ही महाविकास आघाडीतून लढलो होतो. तसेच तेव्हा आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडलं पाहिजे, असं कुणाचं म्हणणं नव्हतं. विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर जर कुणी असं म्हणत असेल तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते. जे उमेदवार पराभूत झाले, ते आम्हाला काही फायदा झाला नाही, असं म्हणू शकतात, असे संजय राऊत यांनी सांगितले.

यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणार का? असं विचारलं असता संजय राऊत यांनी सांगितलं की, या निवडणुकांना वेळ आहे. तेव्हा विचार करू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका या वेगवेगळ्या असतात, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं. 

ते पुढे म्हणाले की, या निवडणुकीत ज्या प्रकारे इव्हीएमचा घोटाळा समोर आला आहे. ज्या प्रकारे पैशांचा वापर झाला आहे. तर त्यामुळे महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांची अवस्था वाईट झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटालाही त्याचा फटका बसला आहे. आम्हालाही बसला आहे. त्यावर आम्हा तिघांनाही एकत्र बसून चर्चा करण्याची गरज आहे. आता आमच्यासमोर मुंबई महानगर पालिका आणि राज्यातील पुणे, नाशिकसारख्या १४ महानगरपालिका निवडणुकांचं आव्हान आहे. त्यात मुंबई महानगर पालिका हे सर्वात मोठं आव्हान आहे. आम्ही त्याबाबत विचार करत आहोत, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSanjay Rautसंजय राऊतMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका