शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
2
अखेर भाजपला उमेदवार भेटला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
3
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
4
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
5
"ती माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मलाही..."; जिम ट्रेनरने सांगितली हत्येची Inside Story
6
"भाजपाच्या आशीर्वादाने टाटा एअरबसचे गुजरातमध्ये ‘सेफ लँडिंग’", नाना पटोलेंचा आरोप  
7
कोण आहे सोफिया सीव्हिंग, जिने पहिलीवहिली पिकलबॉल स्पर्धा जिंकून रचला इतिहास (Photos)
8
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
9
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?
10
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
11
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
2043 पर्यंत या देशांवर मुस्लिमांचे शासन येईल; बाबा वेंगा यांची भविष्यवाणी...
13
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 
14
जळगावमध्ये जागा वाटपातील बेरजेत शिंदे सेना व उद्धव सेना सरस
15
देशात Pickleball चा माहोल! Andre Agassi ला भारत दौऱ्याची उत्सुकता
16
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
17
AUS vs IND : "नक्की काय चाललंय हे कळेनाच", ऋतुराजला पुन्हा एकदा वगळलं; भारतीय दिग्गज संतापला
18
Gold Price Today : धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
“राज्यात लोकप्रिय चेहरा उद्धव ठाकरेच, कुटुंबप्रमुख म्हणून जनता आदराने पाहते”: संजय राऊत
20
"लोकसभेला मी चूक केली, तीच त्यांनी विधानसभेत केली, आता…’’, अजित पवार यांचा शरद पवार गटाला टोला  

संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 1:24 PM

जागावाटपावरून महाविकास आघाडीत अद्याप काही जागांचा घोळ, उद्यापर्यंत सर्व गोष्टी स्पष्ट होतील असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

नागपूर - नागपूर विभागात ठाकरे गटाला १ जागा मिळाली त्यावरून नाराजी असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत मत आहे. आम्हाला कोकणात काहीच मिळालं नाही असं आम्ही म्हणायचं का? संजय राऊतांनी हा विषय बंद केला पाहिजे, आपल्याला विरोधकांच्या विरोधात लढायचं आहे ही भूमिका आपण घेतली पाहिजे. संजय राऊतांनी आता आपली तोफ विरोधकांकडे डागली पाहिजे हा माझा प्रेमाचा सल्ला आहे असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांबाबत केले आहे. 

पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले की, सोलापूर दक्षिणबाबत आमच्या हायकमांडने घेतलेला निर्णय आहे. त्याबाबतीत चर्चा होईल. राज्य म्हणून त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. तिकिट वाटपानंतर काही नाराज होतील. हा प्रक्रियेचा भाग आहे. महाराष्ट्र मोठा आहे. ३ पक्षांची आघाडी आहे. मित्रपक्ष आहेत. त्यामुळे काही जिल्ह्यात एखाद्या पक्षाला जागा मिळणार नाहीत. जवळपास १०-१२ जिल्ह्यात आम्ही उमेदवार दिले नाहीत. संघटना हा महत्त्वाचा भाग आहे. परंतु महाराष्ट्र वाचवणे हे दायित्व जास्त आहे. महाराष्ट्र महायुतीच्या हातात गेला तर पूर्ण महाराष्ट्र विकून गुजरातचं नियंत्रण महाराष्ट्रावर आले असं होईल असं त्यांनी सांगितले.

तसेच राष्ट्रीय पक्ष असतील मग भाजपा असो वा काँग्रेस..त्यांना मित्रपक्षांना सांभाळणे ही राष्ट्रीय पक्षाची जबाबदारी असते. कार्यकर्त्यांच्या वेदना माहिती आहेत. आघाडी महत्त्वाची असते. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना ताकद मिळायला हवी. या युती सरकारने या विचारांना गाडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अपमानित करणे. या लोकांची मानसिकता पाहा. महिलांचा अपमान करणे ही भाजपाची मानसिकता आहे. ते अहिल्यानगरमध्ये दिसले. महाराष्ट्र वाचवणे, शेतकरी, तरुण आणि गरीबाला न्याय देणे, राज्यात कर वाढवले आहेत ते कमी करणे हा आमचा उद्देश आहे. त्यामुळे ही लढाई काँग्रेस लढतेय. ही वेळ महाराष्ट्राला वाचवण्याची आहे. एकत्रित येऊन मविआला निवडून द्यावं असं आवाहन नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान, सांगलीसारखा पॅटर्न कुठे होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. काही जागांचा वाद आहे तो उद्यापर्यंत संपेल. सगळ्या समाजाला संधी मिळावी यासाठी काँग्रेसचा प्रयत्न झालेला आहे. पक्ष संघटना असो वा सत्तेत सर्व समाजाला न्याय कसा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. महाराष्ट्राची संस्कृती भाजपाने खराब करण्याचं पाप केले आहे. मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी ही फूट निर्माण करून सामाजिक तेढ निर्माण केला आहे. जातीय जनगणना करून या सर्व प्रवाहांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल ही भूमिका आमची आहे असं नाना पटोलेंनी सांगितले आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीNana Patoleनाना पटोलेSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे