शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 07:59 IST

Maharashtra Assembly Election 2024: रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून उचलबांगडी होण्यासाठी अहिल्यानगरचे प्रकरण कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई : रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून उचलबांगडी होण्यासाठी अहिल्यानगरचे प्रकरण कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे.

अहिल्यानगरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याविरोधात भाजपचे नेते आणि विखे-पाटील समर्थक वसंत देशमुख यांनी जाहीर भाषणात अपशब्द वापरले होते. याप्रकरणी जयश्री थोरात यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत कारवाईची मागणी केली. मात्र पोलिसांनी जयश्री आणि सोबतच्या महिलांना बराच काळ ठाण्याबाहेर थांबवले. तसेच जयश्री यांच्याविरोधातच गुन्हा दाखल केला. याप्रकरणी विरोधकांनी पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने दीपक मिश्रा, बी. आर. बालकृष्णन व राम मोहन मिश्रा या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तेथे निरीक्षक म्हणून पाठवले. या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून याप्रकरणी राज्य पातळीवरून दबाव आल्याचे नमूद केले होते.

फोन टॅप केल्याच्या आरोपांनंतर चर्चेत ■ शुक्ला यांच्यावर विरोधकांनी फोन टेंप केल्याचा आरोप सातत्याने केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन टॅप केल्याच्या आरोपांनंतर शुक्ला चर्चेत आल्या होत्या.• राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शुक्ला अवैध फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप केला होता.• त्यामुळे निवडणुकीच्या काळात अशा व्यक्तीने राज्याच्या पोलीस महासंचाल कपदी राहू नये अशी मागणी काँग्रेस- कडून करण्यात आली होती.

मुदतवाढीतही अपवाद सहा महिन्यांपेक्षा कमी काळ शिल्लक असताना शुक्ला यांना २ वर्षे मुदतवाढ दिली. एखाद्या महासंचालकाला किमान सहा महिने निवृत्तीसाठी शिल्लक असतील तर दोन वर्षे मुदतवाढीचा लाभ मिळू शकतो. शुक्ला मात्र त्यास अपवाद ठरल्या होत्या. मविआने याबाबत आक्षेप घेतला होता.

नवे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या जागी आलेले नवे पोलिस महासंचालक संजय वर्मा हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून ते १९९० च्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते राज्याच्या कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे तीन दशकाहून अधिक काळ पोलीस सेवेत काम करण्याचा अनुभव आहे. वर्मा न्यायवैद्यक विज्ञानातील त्यांच्या कौशल्यांसाठी ओळखले जातात. माझ्यावर जो विश्वास दाखवून जबाबदारी दिली आहे. त्याबद्दल आभारी आहे. राज्यातील निवडणुका शांततापूर्ण मार्गाने पार पडतील या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्यात येईल, असे संजय वर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाPoliceपोलिसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४