शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:35 IST

Satyajit Tambe : काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबेंनी अजित पवारांची भेट घेतली आहे.

Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल हा अहिल्यानगर येथील संगमनेर तालुक्यात लागला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. शिवसेना शिंदे गटाच्या अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांनी पराभूत केलं आहे. त्यानंतर थोरात यांचे भाचे असलेल्या सत्यजित तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. मात्र भेटीनंतर सत्यजित तांबे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघातून पराभव झाला. त्यांच्या विरोधात निवडणूक लढलेले अमोल खताळ हे विजयी झाले. आठ वेळा आमदार राहिलेल्या थोरात यांना पराभूत करुन अमोल खताळ हे जायंट किलर ठरले आहेत. बाळासाहेब थोरातांच्या पराभवाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दुसरीकडे सत्यजित तांबे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर दुःख व्यक्त केल्याचे तांबेंनी सांगितलं.

माध्यमांशी बोलताना संगमनेरचा निकाल धक्कादायक लागला आहे. ४० वर्ष बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केलं. ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं असेल ते का केलं असेल? असा सवाल सत्यजित तांबे यांनी विचारला. तसेच अजित पवारांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवामुळे दुःख व्यक्त केल्याचेही तांबे म्हणाले. 

"अजितदादांनी मला विशेष करून विचारलं की, बाळासाहेब थोरात यांचा पराभव कशामुळे झाला? काय कारणे असावेत. त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे विशेष दुःखही व्यक्त केले. बाळासाहेब थोरात यांच्यासारखा सीनियर माणूस हा पराभूत व्हायला नको होता. शेवटी त्यांच्या अनुभवाचा सभागृहामध्ये होणारा वापर हा हे सर्व वरिष्ठ नेत्यांना गरजेचा होता," असं तांबेंनी म्हटलं

यावेळी अशोक चव्हाण यांनी केलेल्या टीकेलाही सत्यजित तांबे यांनी प्रत्युत्तर दिलं. "जे टिंगल करत आहेत त्यांनी वरिष्ठांनी केलेलं काम दुर्लक्षित करु शकत नाहीत. खुनशी विचार कुणाच्या मनात असू नयेत. जर अशोक चव्हाण असा विचार करत असतील तर चुकीच आहे. राजकारणी माणूस विसराळू असायला हवा. खुनशी विचार मनात ठेऊन उपयोग नाही," असेही सत्यजीत तांबे म्हणाले. 

दरम्यान, संगमनेर विधानसभा निवडणुकीत अमोल खताळ यांना एक लाख १२ हजार ३८६, तर थोरात यांना एक लाख एक हजार ८२६ मते मिळाली  आहेत. त्यामुळे जायंट किलर ठरलेले अमोल खताळ १० हजार ५६० मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून बाळासाहेब थोरात यांचे संगमनेर मतदार संघात एकहाती वर्चस्व राहिले होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024sangamner-acसंगमनेरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातSatyajit Tambeसत्यजित तांबेAjit Pawarअजित पवार