शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

निकालांआधीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू; महायुती, मविआमधील या  नेत्यांची नावं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 13:20 IST

Maharashtra Assembly Election Result 2024: महायुती आणि महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून अनेक नेत्यांची नावं चर्चेत येत आहेत. तसेच त्यामधील एखाद्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून अनेक नेत्यांची नावं चर्चेत येत आहेत. तसेच त्यामधील एखाद्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी दोन्हीकडच्या नेत्यांनी मतमोजणीनंतर आपल्या पक्षालाच जनादेश मिळेल, असा दावा केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असा दावा केला होता. त्याविरोधात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तसेस महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर मित्रपक्षाचे नेते एकत्र येऊन मुख्यमंत्रिपदावर चर्चा करतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं.जर काँग्रेस हायकमांडने नाना पटोले यांना ते मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असं सांगितलं असेल तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, वरिष्ठ नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी त्याची घोषणा केली पाहिजे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.  

महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितले की, ही विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली. तसेच मतदारांनी मतांच्या माध्यमातून एकनाश शिंदे यांना आपली पसंती दिली आहे. त्यामुळे पुढचे मुख्यमंत्री बनण्यावर एकनाथ  शिंदे यांचा पूर्ण हक्क आहे. तसेच तेच पुढचे मुख्यमंत्री असतील, असा मला विश्वास आहे, असेही संजय शिरसाट म्हणाले.  

तर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे केलं. त्यांनी सांगितले की, भाजपामध्ये कुणी मुख्यमंत्री बनू शकत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. महाराष्ट्रातील जनता ही स्पष्ट जनादेश देण्याच्या दिशेने जात आहे. तसेच मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार नाही.  

तर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांचं नाव पुढे केलं. त्यांनी सांगितलं की, निवडणुकीचा निकाल काहीही लागता तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा किंगमेकरच्या भूमिकेत राहील, असे सांगितले. तर देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील मित्रपक्ष एकत्र येऊन मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील, असे सांगितले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Chief Ministerमुख्यमंत्रीMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी