शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

“उद्धव ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 15:38 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: संजय राऊत आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्ये भांडणे लावत आहेत. सहा महिने थांबा, संजय राऊतांच्या बोलण्याने काय काय झालेय, ते कळेल, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार, याबाबत स्पष्टता आली आहे. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. यानंतर आता घडामोडींना वेग आला असून, जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते सातत्याने ईव्हीएमवर टीका करत असून, अनेक उमेदवार फेरमतमोजणीची मागणी करत आहेत. भाजपा नेत्यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. 

रावसाहेब दानवे यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, पाच तारखेला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे, आधी विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, नेता निवडला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल. जसे ठरले तसे सुरू आहे, कोणताही वाद आमच्यामध्ये नाही. मुख्यमंत्रीपद कोणाला हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे, मात्र मुख्यमंत्री कोण हे आमचे ठरले आहे. जोपर्यंत वरिष्ठांची सही होत नाही, तोवर अधिकृतरित्या नाव जाहीर केले जात नाही, असा आमच्या पार्टीचा विषय आहे. भाजपा राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आहे. वरिष्ठांचा शिक्का बसत नाही, तोवर मुख्यमंत्रिपदी कोण? याबाबत कुठलीही घोषणा होणार नाही. कोणतीही अडचण नाही. सगळे ठरल्याप्रमाणेच होणार आहे, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते

संजय राऊत काय म्हणतात किंवा आतापर्यंत काय बोललेत, याचा इतिहास जर काढला, तर नक्कीच एखादा डॉक्टर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देईल. ते जे बोलले, ते खोटे ठरले आहे. संजय राऊतांनी शिवसेना फोडली. संजय राऊत आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्ये भांडणे लावत आहेत. सहा महिने थांबा, संजय राऊतांच्या बोलण्याने काय काय झालेय, ते कळेल. शिवसेना पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेला नसता, तर २०१४ ते २०१९ या काळात जसे सरकार चालवले गेले तसेच ते आताही सुरू असते. २०१९ ला तर बहुमत आलेच असते. परंतु, आता ते सोबत असते, तर आताही जास्त बहुमत मिळाले असते, असा दावा दानवे यांनी केला. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचे वृत्त दानवे यांनी फेटाळून लावले आहे. एकनाथ शिंदे बिलकुल नाराज नाहीत, केवळ वर्तमानपत्र आणि चॅनलला चाललेली ही बातमी आहे. ते स्वतःच्या गावी गेले आहेत, यात शंका उपस्थित करण्याचा प्रश्न नाही. ते आजारी आहेत. त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असेल, गावी जाण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे, असे दानवे म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४raosaheb danveरावसाहेब दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा