शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 20:07 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विरोधी पक्षनेता होण्यासाठी पक्षाकडे १० टक्के जागा असायला हव्यात. परंतु, मविआतील एकाही पक्षाकडे इतक्या जागा नाहीत.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलाच धक्का बसला. अविश्वसनीय, अनाकलनीय आणि अस्वीकार्ह निकाल असल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांकडून देण्यात आली. महायुतीच्या त्सुनामीत महाविकास आघाडीचा मोठा धुव्वा उडाला. महाविकास आघाडीला आता विरोधी पक्षनेता बसवणेही शक्य होणार नाही. परंतु, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाने दावा केला आहे. यासाठी ठाकरे गट आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर सर्वच पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाची मातोश्रीवर एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भास्कर जाधव गटनेते असणार आहेत. विशेष म्हणजे विधिमंडळातील दोन्ही सभागृहांचे संयुक्त नेते म्हणून आदित्य ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमध्ये संख्याबळ आमचे जास्त असल्याने अर्थात विरोधी पक्ष नेता आमचा होईल, असे भास्कर जाधव यांनी ठामपणे सांगितले. परंतु, याबाबत कायदा काय सांगतो? 

मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?

विरोधी पक्षनेतेपदाबाबत नियम किंवा कायदा काय सांगतो, यावर राज्याचे माजी महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी माहिती दिली आहे. कायद्यात याबाबत कोणताही नियम नाही. परंतु, मागील प्रकरणांचे उदाहरण घेता, विरोधी पक्षनेता होण्यासाठी पक्षाकडे १० टक्के जागा असायला हव्यात. पण संपूर्ण आघाडीचा असा एक नेता नेमण्याचा नियम कायद्यात नाही. पण असा नेता नेमायचाच असेल तर विधानसभेचे सभापती त्यावर निर्णय घेऊ शकतात, असे श्रीहरी अणे यांनी सांगितले. तसेच ठाकरे गट आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतल्याचे सांगितले जात आहे. यावर बोलताना, असा कोणताही नियम नाही. हा केवळ दबाव निर्माण करण्याचा मार्ग आहे. कारण कोणताही नेता त्याच्या पक्षाच्या व्हीपने आधीच बांधील असतो आणि त्याने पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास पक्ष त्याच्यावर कारवाई करू शकतो. यासाठी प्रतिज्ञापत्राची गरज काय, असा उलट प्रश्न अणे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, विधानसभेतल्या विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीसाठी त्या पक्षाकडे विधानसभेतील एकूण जागांपैकी १० टक्के आमदारांची गरज असते. आताच्या विधानसभेत ती संख्या किमान २९ आमदार असणे आवश्यक आहे. महाविकास आघाडीच्या एकाही पक्षाकडे २९ आमदार नाहीत. ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १० जागांवर विजय मिळाला आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidhan sabhaविधानसभाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी