शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 21:23 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी पाठीत खंजीर खुपसला, धोकेबाजांना निवडणुकीत धडा शिकवायचा आहे, अशी टीका तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केली

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी शेवटचे काही तास राहिले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे राज्यातील आणि केंद्रातील नेते जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेसचे तेलंगणधील मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी नांदेड येथील प्रचारसभेत बोलताना अजब आवाहन केल्याचे पाहायला मिळत आहे. 

ऑटोरिक्षा चालवणाऱ्या एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्रिपद दिले. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला, अजित पवार यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला. ज्या काँग्रेसने अशोक चव्हाण यांना दोन वेळा मुख्यमंत्री केले त्यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका रेड्डी यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्ही येथील स्थानिक आहात. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. त्यांनी किती अमाप संपत्ती कमावली आहे हे त्यांनाही माहिती नसेल. त्यांचे मेहनतीचे पैसे नाहीत.  त्यांचे पैसे घ्या पण मत काँग्रेसच्या उमेदवारालाच करा. त्यांनी काही घाम गाळून पैसे कमावले नाहीत. त्यांच्या खिशातूनही पैसे काढून घ्या, ते ही कमी पडले तर त्यांच्या घरी जाऊन ज्या वस्तू आहेत त्या घेऊन टाका, परंतु मतदान काँग्रेसच्या उमेदवाराला करा, असे आवाहन प्रचारसभेत बोलताना केले. 

धोकेबाजांना धडा शिकवायचा आहे

आता विधानसभा निवडणुकीत धोकेबाजांना धडा शिकवायचा आहे. अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री केले. खासदार केले, अशोक चव्हाण यांच्या वडिलांनाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले. दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जी जी म्हणून पदे होती, ती सगळी अशोक चव्हाण यांना काँग्रेसने दिली. अशोक चव्हाण यांना गांधी परिवाराने सगळे काही दिले. परंतु, त्यांनी गांधी परिवाराला फसवले. पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका रेवंथ रेड्डी यांनी केली. 

दरम्यान, निवडणुकीत प्रामाणिक उमेदवार जिंकणे महत्त्वाचा आहे. खोटारड्यांची देशाचा स्पर्धा आहे. मोदींना पराभूत करायचे आहे , अशोक चव्हाण यांना हरवायचे आहे, राजकारणात अशोक चव्हाण दिसू नये, कारण त्यांनी तुमचे नाव खराब केले, या शब्दांत निशाणा साधत, तेलंगण सरकारने दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या , आम्ही कर्जमाफी केली, नोकऱ्या दिल्या. ५० हजार नोकऱ्या दिल्या. भाजपाला आव्हान आहे, येऊन मोजा. एक नोकरी तरी कमी दिसली तर मी जाहीर माफी मागतो, असे आव्हान रेवंथ रेड्डी यांनी केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी