शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

शासनाने बिबट्यांच्या नसबंदीसाठी पुढाकार घ्यावा, सत्यजीत तांबे यांची मागणी

By योगेश पांडे | Updated: December 17, 2024 22:20 IST

Maharashtra Assembly Winter Session: एरवी महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभांमध्ये श्वानांच्या नसबंदीचा विषय चर्चिल्या जातो. मात्र मंगळवारी विधानपरिषदेत बिबट्यांच्या नसबंदीची मागणी उपस्थित करण्यात आली.

- योगेश पांडे नागपूर - एरवी महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभांमध्ये श्वानांच्या नसबंदीचा विषय चर्चिल्या जातो. मात्र मंगळवारी विधानपरिषदेत बिबट्यांच्या नसबंदीची मागणी उपस्थित करण्यात आली. बिबट प्रवण क्षेत्रातील हल्ल्यांचे प्रमाण पाहता नसबंदीबाबत कायदा करणे आवश्यक असून राज्य शासनाने तसा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी मागणी सत्यजीत तांबे यांनी केली.

औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्यांनी ही मागणी केली. अहिल्यानगर, पुणे, नाशिक जिल्ह्यांमध्ये राज्यातील अन्य भागात बिबट्यांची संख्या वाढत आहेत. मानवी वस्त्यांवर हल्ले धोकादायक ठरत आहेत. मागील पाच वर्षांत १४ हजार ४४२ हल्ले झाले व त्यात १४ हजार २४९ पशुधनाची हानी झाली. तर अनेक महिला, नागरिक व लहान मुलांचा मृत्यू झाला. २६ जून रोजी मी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन बिबट्यांच्या नसबंदीसाठी कायद्याबाबत विनंती केली होती. राज्य शासनाने प्रस्ताव पाठविला तर त्याचा सकारात्मक विचार करता येईल असे त्यांनी स्पष्ट केले होते. बिबट्यांवर नियंत्रणासाठी नसबंदी हा एकमेव पर्याय असून त्याचा सरकारने विचार करावा असे तांबे म्हणाले. ग्रामीण भागात शेतीला रात्री वीजपुरवठा होता. शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागते व त्यावेळीच जास्त हल्ले होतात. त्यामुळे असे हल्ले टाळण्यासाठी बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा वीजपुरवठा द्यावा. त्याचप्रमाणे अशा भागातील शेतकऱ्यांच्या शेती व घराला कुंपणासाठी अनुदानाची योजना आणावी, अशी मागणीदेखील तांबे यांनी केली.

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन