शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
2
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
4
अमेरिकेच्या प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रामसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड
5
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय
6
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
7
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
8
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप
9
तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
10
गोळ्या झाडून पोलीस कर्मचाऱ्याने केला पत्नीचा खून; किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल
11
'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश
12
गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम
13
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
14
'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव
15
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
16
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
17
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ
18
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
19
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
20
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...

न्यायालयाच्या मनाईनंतर महाराष्ट्र बंद मागे; आज महाविकास आघाडीची मूकनिदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 6:42 AM

बदलापूर घटनेबाबत पुढील आदेश देईपर्यंत बंदची हाक नको : उच्च न्यायालय

मुंबई : बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरडींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी पुकारलेला महाराष्ट्र बंद उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवत बंद पुकारण्यास मनाई केली. न्यायालयाने दिलेल्या या आदेशाचा आदर करत शनिवारचा बंद मागे घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी सायंकाळी जाहीर केला. मात्र, शनिवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत मविआचे नेते, कार्यकर्ते हे तोंडाला काळी पट्टी लावून महिला, मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांविरुद्ध मूक निदर्शने करणार आहेत.

हा बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘एक्स’वर केले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही बंद मागे घेण्यात येत असल्याची घोषणा केली. शनिवारी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते राज्यभर तोंडाला काळ्या पट्ट्या बांधतील, असे पटोले यांनी जाहीर केले. शरद पवार पुणे येथे, उद्धव ठाकरे दादरच्या शिवसेना भवन येथे तर नाना पटाेले ठाणे येथे मूकनिदर्शने करणार आहेत.

उच्च न्यायालयाने काय दिले आदेश?बदलापूर येथील शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा व्यक्तीने पुढील आदेश देईपर्यंत २४ ऑगस्ट रोजी किंवा त्यानंतरच्या कोणत्याही तारखेला बंदाची हाक देऊ नये, असा आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने यासंदर्भात महाविकास आघाडीतील उद्धवसेना, शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाला नोटीस बजावली. त्याशिवाय राज्य सरकार व गृहमंत्रालयालाही नोटीस बजावत ९ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी ठेवली. ॲड. जयश्री पाटील व नंदाबाई मिसाळ यांनी अनुक्रमे ॲड. गुणरत्न सदावर्ते व ॲड. प्रकाश झा यांच्याद्वारे महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकांवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने हे आदेश दिले. 

२००४ मध्ये न्यायालयाच्या एका खंडपीठाने बंदच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या आव्हानांचा विचार करत बंदची अंमलबजावणी करणे हे घटनाबाह्य आहे, असे मत नोंदवले होते. त्याचा संदर्भ देत न्यायालयाने हा निकाल दिला.  न्यायालयाला या प्रकरणात (राजकीय आरोप-प्रत्यारोप) खेचण्यात येऊ नये. त्यामुळे कोणीही प्रसारमाध्यमांपुढे काहीही विधाने करू नयेत, असेही खंडपीठाने म्हटले आहे. यावेळी राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. 

-----------------

त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता.- शरद पवार, ज्येष्ठ नेते

हे आंदोलन विकृतीच्या विरोधात आहे. जनतेला आता आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे की नाही? बंद पुकारणे व निदर्शने करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. उद्या आम्ही बंद करणार नाही, केवळ निषेध नोंदवू.- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, उद्धवसेना

काँग्रेस न्यायालयाचा सन्मान करणारा पक्ष आहे. आम्ही उद्याचा बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

मुख्यमंत्री काय म्हणाले?उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बंदमागे राजकारण होते. उच्च न्यायालयाने हा बंद अवैध ठरविला आहे. बंदला परवानगी देता येणार नाही असे न्यायालयाने म्हणणे ही विरोधकांना लावलेली चपराकच आहे. 

उपमुख्यमंत्री काय म्हणाले?बंद मागे घेण्याचा योग्य निर्णय मविआने घेतला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनीच आदर केला पाहिजे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारNana Patoleनाना पटोलेMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMahavikas Aghadiमहाविकास आघाडी