शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

Maharashtra Budget Session 2022: अभूतपूर्व! अवघ्या तीन मिनिटांचे अभिभाषण; राज्यपाल आले अन् गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 5:51 AM

Maharashtra Budget Session 2022: विधिमंडळ सदस्यांच्या जोरदार गोंधळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अवघ्या तीन मिनिटांचे अभिभाषण करून सभागृहाबाहेर पडल्याचा अभूतपूर्व प्रसंग विधिमंडळ अधिवेशनात घडला.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विधिमंडळ सदस्यांच्या जोरदार गोंधळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अवघ्या तीन मिनिटांचे अभिभाषण करून सभागृहाबाहेर पडल्याचा अभूतपूर्व प्रसंग विधिमंडळ अधिवेशनात गुरुवारी घडला. त्यावरून सत्तापक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. 

राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होते. सकाळी ११ वाजता राज्यपालांचे संयुक्त सभागृहात दोन्ही सदनांच्या सदस्यांना संबोधित करण्यासाठी आगमन झाले. वंदे मातरम् झाल्यानंतर राज्यपालांनी अभिभाषण वाचनाला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या उल्लेखाने सुरुवात केली. त्यावेळी प्रथम सत्ताधारी बाजूने ‘जय भवानी-जय शिवाजी’ अशा घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदस्यांना हाताने इशारा करीत शांत केले. या घोषणाबाजीला प्रत्युत्तर देत विरोधकांनी ‘दहशतवाद्यांचे हस्तक असलेल्या सरकारचा निषेध असो’, ‘दाऊदच्या हस्तकांचे राजीनामे घ्या’ अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. फलक फडकाविले. घोषणाबाजीनंतर राज्यपाल आपल्या भाषणाचा एकदम शेवटचा परिच्छेद वाचत सभागृहातून बाहेर पडले. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे सदस्य अवाक् झाले.

कशामुळे, कसे घडले?

राज्यपाल कोश्यारी यांनी ‘समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते व गुरुशिवाय शिष्याचे महत्त्व नसते’ अशा आशयाचे विधान केले होते. त्यावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्यपाल अभिभाषणासाठी येताच महाविकास आघाडीच्या सदस्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी - जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या.

भाजपच्या चुकीच्या वर्तनामुळे हे घडले

राज्यपालांनी राष्ट्रगीताचा मान राखला पाहिजे. राष्ट्रगीत हा कार्यक्रमाचाच भाग असतो. सुरुवातीला जसे राष्ट्रगीत असते, तसेच राष्ट्रगीतानंतर कार्यक्रम संपतो; पण या सर्व गोष्टींचे भान न ठेवता ते त्वरित पायउतार झाले. या सगळ्याची जबाबदारी भाजपवर टाकावी लागेल; कारण भाजपच्या चुकीच्या वर्तनामुळे हे घडले. राष्ट्रगीताचा अवमान करणे अपेक्षित नव्हते. जयंत पाटील, जलसंपदामंत्री

सदस्यांच्या भावना तीव्र होत्या

राज्यपाल कोश्यारी सरकारच्या वतीने भाषण करायला आले होते आणि सदस्यांच्या भावना तीव्र होत्या. तुम्ही सरकारच्या वतीने भाषण करीत आहात; पण तेच सरकार दाऊदला शरण होत असेल तर हे भाषण कशाला ऐकायचे, हा सदस्यांचा सवाल होता. त्यामुळे सदस्य एवढीच मागणी करीत होते की, नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे. ही मागणी आम्ही लावून धरणार आहोत. देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेटBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी