शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Maharashtra Election 2019 : सलग दुसऱ्या दिवशी राज्यात मुसळधार; मुंबईवर मळभ, मतदानावर पावसाचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:40 IST

Maharashtra Election 2019: परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला.

मुंबई/पुणे/कोल्हापूर/औरंगाबाद : परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे भात, द्राक्षे, सोयाबीन या पिकांना फटका बसला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून पुढील चार दिवस राज्यात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे़

गेल्या तीन दिवसांपासून पडणाºया मुसळधार पावसाने रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कापलेली भातशेती पावसामध्ये भिजत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून भात, नागली पिके जमिनीवर झोपली आहेत. ‘भोगावती’चे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पंचगंगेच्या पातळीत दिवसभरात दोन फुटांची वाढ झाली.

सांगली आणि सातारा जिल्ह्याला शनिवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर रविवारीही बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. सोलापूर व पुणे जिल्ह्यातही संततधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले.

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात सोमवारी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी पूर्ण झाली असतानाच, दुसरीकडे या दिवशी मुंबई, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान, रविवारी सलग तिसºया दिवशीही मुंबईवरील मळभ कायम होती. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट, तर मराठवाड्याच्या काही भागांत लक्षणीय घट झाली. विदर्भाच्या उर्वरित भागांत किंचित घट झाली आहे.

तीन दिवस पावसाचे

२१ व २२ ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बºयाच ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ २३ व २४ ऑक्टोबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बºयाच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़

२१ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात गडगडाट व जोरदार वाºयासह पावसाची शक्यता आहे़ पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, चार जिल्ह्णात २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान जोरदार वाºयासह विजेच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़ बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात २१ ऑक्टोबरला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे़

सोयाबीनला फटका

मराठवाड्यातील नांदेड, परभणी, लातूर,बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली.काढणीला आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे़ नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे मोठे नुकसान केले आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू होती. विदर्भात हलक्या सरी कोसळत होत्या.

राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MumbaiमुंबईVotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग