शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Maharashtra Election 2019: ...तोपर्यंत राजकारण सोडणार नाही; उद्धव ठाकरेंची प्रतिज्ञा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 09:08 IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध मुद्द्यांवर भाष्य

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपामध्ये बऱ्याच दिवसांपासून चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होतं. शिवसेना निम्म्या जागांसाठी आग्रही होती. मात्र अखेर शिवसेनेला १२४ जागांवर समाधान मानावं लागलं. याशिवाय आणखी एका अर्थानं यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी महत्त्वाची आहे. इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात ठाकरे घराण्यातील व्यक्ती उतरली आहे. आदित्य यांना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेना कामाला लागली आहे. विधानसभा निवडणुकीतील याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला मुलाखत दिली आहे.शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत राजकारण सोडणार नसल्याचं उद्धव यांनी मुलाखतीत म्हटलं आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत राजकारण सोडणार नाही, असं वचन मी बाळासाहेबांना दिलं आहे. शिवसेनाप्रमुखांना दिलेलं वचन मी जोपर्यंत पूर्ण करत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार उद्धव यांनी व्यक्त केला. भाजपा हे ऐकलं का, या प्रश्नाला त्यांनी माझं वचन आहे. ते मी पूर्ण करणार, असं उत्तर त्यांनी दिलं.भाजपाकडून सातत्यानं उपमुख्यमंत्रीपद देऊ, असं निवेदन देण्यात येत असल्याची आठवण संजय राऊत यांनी करुन दिली. त्यावर बाळासाहेबांना वचन देण्यासाठी मला कोणाच्याही परवानगीची गरज नसल्याचं उद्धव म्हणाले. कोणी ऐको न ऐको. हे वचन मी कोणाला विचारुन दिलेलं नाही. हे वचन मी माझं सर्वस्व, अर्थात माझे गुरू, माझे पिता, माझा नेता.. जे काही मी मानतो त्यांना दिलेलं हे वचन आहे आणि ते मी कोणाच्या परवानगीनं दिलेलं नाही. कुणाच्याही परवानगीवाचून ते अडणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे