शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 19:44 IST

विदर्भातील काही जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात टोकाचा वाद होता. हा वाद दिल्ली हायकमांडजवळही पोहचला होता. 

मुंबई - महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला आहे. लवकरच मविआचं जागावाटप जाहीर होईल. या जागावाटपात काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार आहे. काँग्रेस १०५-११०, शिवसेना ठाकरे ९०-९५ तर शरद पवारांची राष्ट्रवादी ७५-८० जागा लढवण्याची शक्यता आहे. २०१९ च्या निकालानंतर राज्यातील राजकारण बदललं. याआधी प्रमुख ४ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते, तेव्हा युती आणि आघाडीत प्रत्येक पक्ष १०० पेक्षा जास्त जागा लढवत होता. मात्र पहिल्यांदाच शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला १०० पेक्षा कमी जागांवर लढावं लागत असल्याचं चित्र दिसून येते. 

विदर्भातील काही जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात टोकाचा वाद होता. हा वाद दिल्ली हायकमांडजवळही पोहचला. हरियाणा निकालानंतर धडा घेतलेल्या काँग्रेसनं महाराष्ट्रात चूक नको, यासाठी लवकरात लवकर हा वाद मिटवण्याचे नेत्यांना आदेश दिले. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांना मविआतील समन्वयासाठी जबाबदारी देण्यात आली. बाळासाहेब थोरात यांनी आज शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर उद्धव ठाकरेंच्याही भेटीला पोहचले. मविआची दुपारपासून जागावाटपावर बैठक सुरू आहे. त्यात जागावाटपाचा तिढा सुटल्याचं कळतंय. 

२०१९ नंतर बदललं राज्यातलं राजकारण

गेल्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा महायुतीला जनतेनं कौल दिला होता. मात्र मुख्यमंत्रि‍पदावरून या दोन्ही पक्षात बिनसलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणलं. त्यानंतर अडीच वर्षांनी पुन्हा राजकीय भूकंप झाला. त्यात शिवसेना-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटले. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या भूमिकेमुळे शिवसेना-राष्ट्रवादीचे २ गट तयार झालेत. त्यात एक गट भाजपासोबत महायुतीत तर दुसरा काँग्रेससोबत महाविकास आघाडीत आहे. यंदाची लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार आहे.

४ महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. मिशन ४५ चं स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला राज्यात केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसनं सर्वाधिक १३ जागा जिंकल्या, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ९ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ८ जागा जिंकता आल्या. आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी  ताकदीनं महायुतीविरोधात मैदानात उतरली आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबरच्या निकालात कोण बाजी मारते हे येणारा काळ ठरवेल.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेस