शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

भाजपाच्या पराभूत उमेदवारांची मानसिकता सकारात्मक - चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 14:40 IST

गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपाच्या उमेदवारांची बैठक आज मुंबईत झाली.

मुंबई - गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपाच्या उमेदवारांची बैठक आज मुंबईत झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उमेदवारांना मार्गदर्शन केले. दरम्यान, निवडणुकीत पराभव झाला असला तरी भाजपाच्या या उमेदवारांची मानसिकता सकारात्मक असून, त्यांनी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केले आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठक आटोपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपाच्या 59 उमेदवारांची आज बैठक झाली. या बैठकीत पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यात आला. तसेच या उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान ही बैठक संपल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, ''विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षांनी मिळून एकूण 164 जागा लढवल्या होत्या त्यापैकी 105 जागांवर आम्हाला विजय मिळाला. तर 59 जागांवर पराभव पत्करावा लागला. त्यापैकी काही जागांवर अगदी निसटत्या फरकाने पराभव झाला. आज या पराभूत उमेदवारांची बैठक झाली. तिथे या पराभवाच्या कारण्यांचा आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान सर्व पराभूत उमेदवारांची मानसिकता सकारात्मक दिसून आली. त्यांनी आता आगामी निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या उमेदवारांनी कामाला सुरुवात केली आहे.'' ''या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पराभूत आमदारांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी राज्यात भारतीय जनता पक्षाचंच सरकार स्थापन होईल, असा विश्वास उपस्थित त्यांनी पराभूत उमेदवारांनी दिला. तसेच पराभूत झालेल्या उमेदवारांना राजकीय बळ मिळावे यासाठी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना सरकारमध्ये तसेच पक्षसंघटनेत सामावून घेण्यात येणार आहे,'' असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :BJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019