शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
5
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
8
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
9
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
10
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
11
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
12
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
13
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
14
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
15
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
16
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
17
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
18
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
19
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
20
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

Maharashtra Government: राज्यपालांच्या भूमिकेवर तिन्ही पक्षांचे प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 5:07 AM

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मध्यरात्रीनंतर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्याची शिफारस केली आणि ती उठताच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना सकाळी ७.४५ वाजता मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. आकस्मिकपणे घडलेल्या या घडामोडीवर  शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ आॅक्टोबर रोजी लागला, त्यानंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासंदर्भात समर्थता दर्शविण्यासाठी मुदत दिली. भाजपने असमर्थता व्यक्त करताच, शिवसेनेला सरकार स्थापन करण्याचा दावा सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली. शिवाय शिवसेनेला पाठिंब्यासंदर्भात आमदारांच्या सह्यांचे स्वतंत्र पत्रे सादर करण्यास सांगितले होते. हा नियम फडणवीस व अजित पवार यांना का लावण्यात आला नाही, असा सवाल शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आजच्या घडामोडींनंतर उपस्थित केला आहे.शहानिशा केली का-नवाब मलिकअजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून आमदारांचे जे पत्र सादर केले, त्यातील नावांची वा खरोखर त्या आमदारांचा पाठिंबा आहे का, याची शहानिशा केली का, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला.फडणवीस व अजित पवार यांनी राज्यपालांना किती आमदारांच्या आणि किती वाजता पाठिंब्याचे पत्र दिले?याचे उत्तर राज्यपालांनी द्यायला हवे, अशी मागणी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस