शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Maharashtra Government: शिवसेनेकडून संजय राऊतांचा वापर: नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 15:54 IST

शिवसेनेची दिशाभूल करून त्यांना बरबाद करण्याचे काम राऊत हे करत असल्याचे सुद्धा राणे म्हणाले.

मुंबई : भाजपानं शरद पवारांचे पुतणे असलेल्या अजित पवारांना गळाला लावून भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन केलं, त्यामुळे राज्याच्या राजकारणाला वेगळीच दिशा मिळाली. मात्र त्यांनतर भाजप -शिवसेना नेत्यांमधील वाद अधिकच वाढला असून, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. तर संजय राऊतांचा शिवसनेने आजपर्यंत फक्त वापर करून घेतला असल्याचा खोचक टोला नारायणे राणेंनी राऊत यांना लगावला आहे.

महाविकासआघाडीला राज्यपालांनी बोलवले होते. मग त्यांनी आपले बहुमत सिद्ध का केले नाहीत. आता आम्ही सरकार स्थापन केले असून 30 तारखेला बहुमत सुद्धा सिद्ध करू, असे राणे म्हणाले. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना आमच्याकडे बहुमतापेक्षा जास्त आमदार असल्याचे दावा करत आहे. मात्र त्यांना त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही. त्यामुळे आतापर्यंत पाच वेळा आमदारांचे ठिकाण बदलण्यात आले असल्याचा आरोप राणे यांनी केला.

पुढे बोलताना त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. संजय राऊत यांचे माझ्यासमोर नाव घेत जाऊ नका. संजय राऊत हे कोण आहेत. एक महिन्यापासून ते बडबड करत असताना सुद्धा काहीच झालंं नाही. त्यांना कुणीच विचारत नसल्याचे राणे म्हणाले. तर शिवसनेचे लोकं राऊत यांचे वापर करत आहे. तसेच शिवसेनेची दिशाभूल करून त्यांना बरबाद करण्याचे काम राऊत हे करत असल्याचे सुद्धा राणे म्हणाले.

तर गेल्या चाळीस वर्षापासून मी महाराष्ट्राच्या राजकरणात सक्रीय असून, सर्वच पक्षातील आमदार माझ्या संपर्कात आहे. माझी सर्वांशी चांगली ओळख असून आमचे मैत्रीचे संबंध असल्याचे राणे म्हणाले. शिवसेनेत मी 39 वर्षे काढली आहे, त्यामुळे सेनेचे सर्वच आमदार माझ्या ओळखीचे असल्याचे ते म्हणाले. तसेच मी भाजपमध्ये असल्याने माझी जवाबदारी आहे की, आमच्या पक्षाचे सरकार स्थापन करावे. त्यामुळे त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे राणे म्हणाले.