शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

Maharashtra Government : 'हम होंगें कामयाब!', राष्ट्रवादी प्रचंड आशावादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 10:34 IST

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एक सूचक विधान केलं आहे. राष्ट्रवादी अद्यापही शिवसेना आणि काँग्रेसलासोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासंबंधी सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी सोमवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक शेर शेअर केला

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या सरकारला विधानसभेत तोंडघशी पाडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एक सूचक विधान केलं आहे. 'हम होंगे कामयाब!' म्हणत मलिक यांनी राष्ट्रवादी अद्यापही शिवसेना आणि काँग्रेसलासोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासंबंधी सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे. 

नवाब मलिक यांनी सोमवारी (25 नोव्हेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक शेर शेअर केला आहे. 'अगर फलक को जिद है बिजलियाँ गिराने की, तो हमें भी जिद है वहीं पर आशियाँ बसाने की ... हम होंगे कामयाब!' असं ट्विट मलिक यांनी केलं आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांना भेटून त्यांचं मन वळविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते अपयशी ठरले. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही अजित पवारांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी गेले असून, अजित पवारांचं मन वळविण्यात त्यांना यश मिळतं की नाही हे थोड्याच वेळात समजणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 54 पैकी 52 आमदारांचं समर्थन मिळाल्याची चर्चा आहे. हरयाणातल्या गुरुग्राममधून राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना मुंबईत आणण्यात आलं आहे. सर्व चारही आमदार भाजपाच्या ताब्यात होते, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. 

अनिल पाटील, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा आणि नरहरी जिरवार हे चार आमदार अजितदादा समर्थक असल्याचं बोललं जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 54 पैकी 52 आमदारांचं समर्थन मिळाल्याची चर्चा आहे. हरयाणातल्या गुरुग्राममधून राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना मुंबईत आणण्यात आलं आहे. सर्व चारही आमदार भाजपाच्या ताब्यात होते, असा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. अनिल पाटील, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा आणि नरहरी जिरवार हे चार आमदार अजितदादा समर्थक असल्याचं बोललं जात आहे.

महाविकासआघाडीकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरू असताना राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपासोबत जात थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. यावर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं. अजित पवारांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाकडून घेतला जाईल. एक व्यक्ती हा निर्णय घेणार नाही, असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसnawab malikनवाब मलिकBJPभाजपाAjit Pawarअजित पवारShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस